Maharashtra weather : कोकण गोवा विदर्भात दमदार कोसळणार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी; वाचा हवामानाचा अंदाज
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra weather : कोकण गोवा विदर्भात दमदार कोसळणार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra weather : कोकण गोवा विदर्भात दमदार कोसळणार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी; वाचा हवामानाचा अंदाज

Published Aug 23, 2023 07:45 AM IST

IMD Maharashtra Weather Forecast : राज्यात मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळे बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार आहे. तर पुढील पाच दिवस कोकण, गोवा, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी राहणार आहे.

Vidarbha And Marathwada Rain Update
Vidarbha And Marathwada Rain Update (HT)

पुणे : राज्यात मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळे बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार आहे. तर पुढील पाच दिवस कोकण, गोवा, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी राहणार आहे. तर पुण्याच्या घाट विभागात जोरदार ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Chandrayaan 3 : भारत इतिहास रचणार! चांद्रयान ३ लॅंडींगसाठी सज्ज, मोहिमेत ८० टक्के बदल; 'ती' १७ मिनिटं ठरणार महत्वाची

मोसमी पावसाचा आस हा उत्तरेकडे सरकला आहे. परिणामी राज्यावर कुठलीही यंत्रांना कार्यान्वित नाही. यामुळे पुढील ३ दिवसांत राज्यात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार कोकण गोव्यात पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात पुढील २ दिवस तुरळक ठिकाणी तर पुढील ३ दिवस काही ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पुढील पाचही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात आज देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असून ही अवस्था पुढील पाच दिवस राहणार आहे.

Chandrayaan 3 : चंद्रावर होणार भारताचा सूर्योदय ! मोहीम यशस्वी होण्यासाठी भारतीयांची प्रार्थना; पाहा फोटो

मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी वीजांच्या गडगटासह होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी वीजांच्या गडगटासह होण्याची शक्यता आहे. पुण्यात पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवार, २५ ऑगस्टपासून कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे निघून गेले आहे.

राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची तूट वाढली आहे. जुलै महिन्यात राज्यात जोरदार पाऊस झाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात पहिले १५ दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, १७ तारखेपासून पावसाने पुनरागमन केले. मात्र काही दिवसच ही स्थिती राहिली. दरम्यान, राज्यावर मॉन्सूंनची कोणतीही प्रक्रिया कार्यान्वित नसून पावसाचा जोर ओसरणार आहे.

राज्यात जवळपास ९६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पिकांच्या पोषणासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे. मात्र, राज्यात पावसाचा जोर ओसरला असून ही पिके संकटात सापडल्याने बळीराजा चिंतेत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर