महाआघाडीमध्ये फूट? जागावाटपावरून काँग्रेस पाठोपाठ अखिलेश यादवही नाराज, सपा महाराष्ट्रात २० जागांवर लढणार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाआघाडीमध्ये फूट? जागावाटपावरून काँग्रेस पाठोपाठ अखिलेश यादवही नाराज, सपा महाराष्ट्रात २० जागांवर लढणार!

महाआघाडीमध्ये फूट? जागावाटपावरून काँग्रेस पाठोपाठ अखिलेश यादवही नाराज, सपा महाराष्ट्रात २० जागांवर लढणार!

Updated Oct 27, 2024 06:54 PM IST

Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव खूश नसल्याचे बोलले जात आहे. सपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांनी शनिवारी महाविकास आघाडी आघाडीकडे पक्षासाठी पाच जागांची मागणी केली होती.

सपा महाराष्ट्रात २० जागांवर लढणार!
सपा महाराष्ट्रात २० जागांवर लढणार!

विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबर रोजी संपत आहे, पण महाविकास आघाडी घटक - काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांमधील १० ते १२ जागा वाटपावरून मतभेद टोकाला पोहोचले आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांची सपाही आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे करण्याच्या तयारीत दिसत आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव खूश नसल्याचे बोलले जात आहे. सपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांनी शनिवारी महाविकास आघाडी आघाडीकडे पक्षासाठी पाच जागांची मागणी केली होती. पण त्यांच्या बोलण्याला महाविकास आघाडीचे नेते कोणतेही ठोस उत्तर देत नाहीत. आझमी यांच्या मते, अखिलेश यादव यांच्या नाराजीचे हेच कारण असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात २८८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष काँग्रेस, शिवसेना-यूबीटी आणि राष्ट्रवादी चे शरद पवार यांना प्रत्येकी ९० जागा मिळाल्या आहेत. उर्वरित जागांसाठी इतर छोट्या मित्रपक्षांशी चर्चा झाली.

या जागावाटपावर सपाचे अबू आझमी यांनी सांगितले की, धुळे शहरातून शिवसेनेच्या यूबीटीने अनिल गोटे यांना उमेदवारी दिली. सपाने मागणी केलेल्या पाच जागांपैकी ही एक जागा होती. आझमी यांच्या मते, यामुळे अखिलेश यादव नाराज झाले आहेत. महाविकास आघाडीने आमची विनंती मान्य केल्यानंतर आता राज्यात २० जागा लढवण्याचा पक्षाचा विचार आहे. या मतदारसंघात सेक्युलर मतांची विभागणी झाली तर त्याला महाविकास आघाडीचे बडे नेते जबाबदार असतील, असे ते म्हणाले.

धुळे शहर, मालेगाव मध्य, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि मानखुर्द शिवाजीनगर या पाच जागांसाठी सपाने उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. आझमी स्वत: मानखुर्द शिवाजीनगरचे विद्यमान आमदार आहेत. रियास शेख हे भिवंडी पूर्वचे पक्षाचे आमदार आहेत. पाचही जागांवर अल्पसंख्याक मतदारांचे वर्चस्व आहे. अशा स्थितीत सपाला या जागा सहज जिंकता येतील, असे वाटते. सपाने मालेगाव मध्यमधून शान-ए-हिंद नेहाल अहमद आणि धुळ्यातून इरशाद जागीरदार यांना उमेदवारी दिली आहे. दोघांनीही एबी फॉर्म मिळाल्याची पुष्टी केली असून २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सपा पूर्वी १२ जागांची मागणी करत होती, याची आठवणही आझमी यांनी करून दिली. पण इथून ते पाच जागांवर आले आहे.

सपा नेते फहाद अहमद शरद पवार गटात -

समाजवादी पक्षाचे नेते व अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांनी सप सोडून शरद पवारांची राष्ट्रवादी ज्वाईन केली आहे. त्यांना राष्ट्रवादीने अनुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांच्याशी होणार आहे.  समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी फहाद अहमद यांच्यासाठी अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाची जागा शरद पवारांकडे मागितली होती. अबू आझमी यांच्याकडे फहाद अहमद यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर