HSC-SSC Board Exams: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून समुपदेशन सुविधा, मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC-SSC Board Exams: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून समुपदेशन सुविधा, मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

HSC-SSC Board Exams: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून समुपदेशन सुविधा, मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

Updated Feb 04, 2025 11:31 PM IST

Maharashtra Board Exam : परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठीऑनलाईन समुपदेशन सुविधा उपलब्घ करून देण्यात आली आहे.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून समुपदेशन सुविधा
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून समुपदेशन सुविधा

Maharashtra State Board HSC SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ११ फेब्रुवारी ते  १८ मार्च दरम्यान होणार आहे तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) २१ फेब्रवारी ते १७ मार्च दरम्यान आयोजित केली आहे. ही परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,  कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. 

परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यास व त्यांच्या मनातील प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सुविधा उपलब्घ करून देण्यात आली आहे. राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे समुपदेशक लेखी परीक्षेपूर्वी व परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते सात्री ८ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी व पालकांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आदीबाबत शंका समुपदेशकांना विचारू नयेत, असे राज्य परीक्षा मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी म्हटले आहे. 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी - बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत (Maharashtra board exams 2025) विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बोर्डाकडून हेल्पलाइन व नियंत्रण केंद्राची घोषणा केली आहे. पालक व विद्यार्थी इथे संपर्क साधून शंकांचे निरसन करून घेऊ शकतात. ही सुविधा आज, ४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २८ मार्चमध्ये होणार आहे. यासंदर्भात विद्यार्थी, पालक किंवा इतर संबंधितांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी हे नियंत्रण केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

समुपदेशकांचे मोबाईल नंबर खालीलप्रमाणे -

  1. ९०११३०२९९७
  2. ८२६३८७७६८९६
  3. ८७६७७५३०६९
  4. ७३८७४००९७०
  5. ९९६०६४४४११
  6. ७२०८७७५२२५
  7. ८१६९२०२२१४
  8. ९८३४०८४५९३
  9. ८३२९२३००२२
  10. ९५५२९८२११५

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर