Maharashtra Rain: कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार; ८ जिल्ह्यांना रेड अलर्ट
राज्यात मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
Maharashtra Rain: गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, (Mumbai) कोकण, कोल्हापूर, (Kolhapur) सातारा, (Satara) पुणे (Pune) या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. याशिवाय विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच गडचिरोली (Gadchiroli) आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत रिमझिम पाऊस पडत असून पुण्यात संततधार सुरूच आहे. गडचिरोलीत मुसळदार पावसाने अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. हा पाऊस पुढचे चार ते पाच दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोमवारी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात ८ जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद,जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, भंडारा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या