Mumbai: मुंबईत भाजपचा अध्यक्ष कोण होणार? आशिष शेलार मंत्री झाल्यानंतर चार नावं चर्चेत!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: मुंबईत भाजपचा अध्यक्ष कोण होणार? आशिष शेलार मंत्री झाल्यानंतर चार नावं चर्चेत!

Mumbai: मुंबईत भाजपचा अध्यक्ष कोण होणार? आशिष शेलार मंत्री झाल्यानंतर चार नावं चर्चेत!

Dec 30, 2024 03:13 PM IST

New Mumbai BJP president: मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या पदासाठी चार जणांची नावे आघाडीवर आहे.

मुंबईत भाजपचा अध्यक्ष कोण होणार? आशिष शेलार मंत्री झाल्यानंतर चार नावं चर्चेत!
मुंबईत भाजपचा अध्यक्ष कोण होणार? आशिष शेलार मंत्री झाल्यानंतर चार नावं चर्चेत! (HT)

Mumbai News: भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांची महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात निवड झाल्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. पुढच्या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजप मुंबई अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आशिष शेलार यांची ऑगस्ट २०२२ मध्ये भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.

मुंबईत मे महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्षपद अत्यंत महत्त्वाचे आहे. आशिष शेलार यांच्यानंतर अमित साटम, अतुल भातखळकर, पराग अलवाणी आणि संजय उपाध्याय यांच्याकडे पाहिले जात आहे.हे सर्व मुंबई विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. यापैकी संजय उपाध्याय हा उत्तर भारतीय चेहरा आहे. अमित साटम हे अंधेरी पश्चिम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. तर, अतुल भातखळकर- कांदिवली पूर्व, पराग अलवानी- विले पार्ले आणि संजय उपाध्याय हे बोरीवली मतदारसंघातून विजयी झाले.

भाजप मुंबई अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण आघाडीवर?

काँग्रेसमधील मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची कमान डॉ.वर्षा गायकवाड यांच्या हाती आहे. पक्षाने अद्याप वर्षा गायकवाड यांना हटवण्याचे संकेत दिलेले नाहीत. दुसरीकडे, भाज आता बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजप कोणती भूमिका घेते हे पाहायचे आहे. संजय उपाध्याय यांच्याकडेही फडणवीस अध्यक्षपदाची जबाबदारी देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संजय उपाध्याय हे यापूर्वी मुंबई भाजपचे सरचिटणीसही राहिले आहेत. २०११ मध्ये त्यांना ही जबाबदारी देण्यात आली, तेव्हा ते मुंबई भाजपचे सर्वात तरुण सरचिटणीस बनले. तेव्हापासून त्यांनी संघटनेत अनेक पदे भूषवली आहेत. तसेच अमित साटम हे संघाचे अत्यंत जवळचे मानले जातात.

राज्यातील अनेक निवडणुका लांबणीवर

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यांसह विविध कारणांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. राज्यातील २९ महानगरपालिका, २२८ नगरपरिषदा, २९ नगरपंचायती, २६ जिल्हा परिषदा, २८९ पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित आहेत.भाजप आणि महायुतीसाठी सध्या पोषक वातावरण असल्यामुळे लवकरात लवकर निवडणूक घेतली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अद्यापही मुंबई महानगर निवडणुकीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर