Rajan Salvi Resigned From UBT : उद्धव ठाकरेंना कोकणात मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवीयांनी बुधवारी शिवसेना ठाकरे पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचबरोबर साळवी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. राजन साळवी उद्या (गुरुवार) दुपारी ३वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू घेतल्यामुळे साळवी दुखावले गेले होते. यामुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. राजन साळवी यांच्या जाण्याने ठाकरे गटाला कोकणात मोठे नुकसान होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या मोजक्या आमदारांमध्ये राजन साळवी यांचा समावेश होता. त्यांच्या राजीनाम्याने उद्धव ठाकरेंची कोकणातील ताकद कमी होणार असून शिंदे सेनेची ताकद वाढणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजन साळवी अनेक वर्षे आमदार राहिले आहेत. लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विधानसभेच्या २०२४च्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला होता. शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा राजापूर मतदारसंघातून पराभव केला होता.
त्याचबरोबर राजन साळवी आणि त्यांच्या पत्नीच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (ACB)ससेमिरा लागला होता. तरीही राजन साळवी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. मात्र,विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे राजन साळवी नाराज होते. यावरुन ठाकरे गटात अंतर्गत धुसफुस सुरु होती.
काँग्रेस सरचिटणीस आणि प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी मंगळवारी रात्री दिल्ली येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.विधानसभानिवडणुकीत हेमलता पाटील यांना उमेदवारी न देता मध्य नाशिकची जागा ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांना दिलीहोती. यामुळे पाटीलनाराज होत्या. तसेच ऐनवेळी ठाकरे गटाने एबी फॉर्म देऊनहीत्यांनी उमेदवारी ऐनवेळी माघारी घेतली होती.त्यानंतर काही दिवसातच त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.
संबंधित बातम्या