Air Quality News : काळजी घ्या! मुंबई, नागपूर, पुणे, नाशिकसह अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता घसरली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Air Quality News : काळजी घ्या! मुंबई, नागपूर, पुणे, नाशिकसह अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता घसरली

Air Quality News : काळजी घ्या! मुंबई, नागपूर, पुणे, नाशिकसह अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता घसरली

Updated Oct 31, 2024 07:34 AM IST

Maharashtra air pollution: मुंबईसह राज्यातील अनेक शहरातील वातावरणात मागील काही दिवसांपासून बदल होत असून हवेतील गुणवत्ता कमालीची घसरल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई, नागपूर, पुणे, नाशिकसह अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता घसरली
मुंबई, नागपूर, पुणे, नाशिकसह अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता घसरली

Maharashtra Air Pollution News: हवामानातील बदल, वाहनांचे वाढते उत्सर्जन आणि फटाक्यांमुळे राज्यातील बहुतेक शहरे सर्वाधिक प्रदूषित ठरली आहेत. एक्यूआय डॉट इनच्या रिअल टाइम आकडेवारीनुसार, राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबई, नागपूर, पुणे, नाशिकसह अनेक शहरांचा समावेश आहे, जिथे हवेची गुणवत्ता खालावली आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता बुधवारी 'मध्यम' श्रेणीत राहिली. एएनआय वृत्तसंस्थेने नुकताच मुंबईतील वांद्रे परिसरातील व्हिडिओ शेअर केला, ज्यात धुक्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. कमी तापमानामुळे या भागात हवेची दृश्यमानता कमी असल्याचे दिसून आले.

बुधवारी महाराष्ट्राचा हवा गुणवत्ता निर्देशांक ९४ होता. एक्यूआय डॉट इनच्या सकाळी ८.१७ वाजताच्या रिअल टाइम डेटाच्या आधारे महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहरांची यादी खालीलप्रमाणे आहे.

CityAQI
Uran 322
Mumbai122
Kalyan116
Ulhasnagar110
Bhiwandi105
Thane95
Nagpur90
Pune89

महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आदी ठिकाणी सोमवारच्या तुलनेत मंगळवारी हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा झाली. सीपीसीबीच्या दैनंदिन बुलेटिनआकडेवारीनुसार, मुंबईचा दैनंदिन सरासरी एक्यूआय २८ ऑक्टोबरच्या १५३ वरून मंगळवारी ९६ वर आला आहे. त्याचप्रमाणे नागपूरची दैनंदिन एक्यूआय सरासरी सोमवारी १४६ वरून मंगळवारी १०२ वर आली.

पाच वर्षांत वायू प्रदूषणात लक्षणीय वाढ

भारतातील बहुतांश राज्यांमध्ये वायू प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे. महाराष्ट्रात आर्थिक घडामोडींची केंद्रे असलेल्या मुंबईसह अनेक शहरांत गेल्या पाच वर्षांत वायू प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये गेल्या पाच वर्षांत वायू प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे, असे डेक्कन हेराल्डने रेस्पिरेटर लिव्हिंग सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या (रेस्पिरेटर) अहवालाचा हवाला देत म्हटले आहे.

राज्यातील १९ पैकी १० शहरांमध्ये प्रदूषण वाढले

२०१९ ते २०२४ या कालावधीत प्रमुख शहरांमध्ये पीएम २.५ कणांचे प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीच्या विश्लेषणातून समोर आले आहे. डेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (एनसीएपी) लक्ष्यित उपाययोजना करूनही महाराष्ट्रातील १९ पैकी १० शहरांमध्ये पीएम २.५ प्रदूषणाची पातळी वाढली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर