anuskura ghat landslide :अनुस्कुरा घाटात दरड कोसळली, रत्नागिरीहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक ठप्प
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  anuskura ghat landslide :अनुस्कुरा घाटात दरड कोसळली, रत्नागिरीहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक ठप्प

anuskura ghat landslide :अनुस्कुरा घाटात दरड कोसळली, रत्नागिरीहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक ठप्प

Jun 14, 2024 08:58 AM IST

anuskura ghat land slide : रत्नागिरी व कोल्हापूरला जोडणारा महत्वाचा रस्ता असणारा अनुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळली. या मुळे या घाटातील वाहतूक ही ठप्प झाली आहे.

अनुस्कुरा घाटात दरड कोसळली, रत्नागिरीहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक ठप्प
अनुस्कुरा घाटात दरड कोसळली, रत्नागिरीहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक ठप्प

anuskura ghat land slide : रत्नागिरी व कोल्हापूरला जोडणारा महत्वाचा रस्ता असणारा अनुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळली. या मुळे या घाटातील वाहतूक ही ठप्प झाली आहे. या घाटात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ही दरड कोसळली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने दरड हटवण्याचे काम सुरू केले आहे.

double sim phone : एका फोनमध्ये दोन सिम वापरणे आता महागात पडणार, TRAI करणार आहे 'हा' मोठा बदल

कोल्हापूर जिल्ह्यात व रत्नागिरी जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. अनुस्कुरा घाटात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी रात्री या घाटात अचानक मोठी दरड कोसळली. यामुळे या घाटातील वाहतूक ही ठप्प झाली आहे. या घटनेत जीवित हानी झालीची अद्याप कोणतीही माहिती नाही. या घटनेमुळे या घाटातील वाहतूक ही ठप्प झाली आहे. ही वाहतूक सकाळ पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. ही दरड रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत कोसळली आहे.

Maharashtra weather update : राज्यात पुणे, मुंबईसह या जिल्ह्यात तूफान बरसणार! हवामान विभागाने दिला पावसाचा यलो अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यातून अनुस्कुरा मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात येणारी वाहतूक या घटनेमुळे सकाळपर्यंत बंद करण्यात आली आहे. घाटात कोसळलेली दरड हटवण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. या साठी राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जेसीबीच्या साह्याने ही दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मोठे खडक फोडून ही दरड हटवण्यासाठी ब्लास्टींग मशीनदेखील मागवण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली .

दरड काढल्यावर होणार वाहतूक सुरळीत

`घाटात सध्या युद्ध पातळीवर दरड काढण्याचे काम सुरू असून ही दरड पूर्णपणे काढल्यावर या मार्गावरील वाहतूक ही पुन्हा सुरु केली जाईल. मात्र, हा रस्ता तोपर्यंत वाहतुकीसाठी बंद केला आहे, अशी माहिती राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे.

धोकादायक स्थळांची पाहणी करणार

या घाटात सुरक्षित वाहतुक होण्यासाठी धोकादायक स्थळांची देखील पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार या ठिकाणी उपाय योजना केल्या जाणार आहेत. नागरिकांनी व प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासाने केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर