Ladki Bahin Yojana: महिलांच्या सक्षमिकरणासाठी महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली. या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणात महिलांनी अर्ज केले. मात्र, निकषात बसत नसतांना देखील काही महिलांनी या साठी अर्ज केले. आता अशा अर्जदारांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकार फेरतापासणी करण्याच्या विचारात आहे. त्यापूर्वी अशा अर्जदारांना लाभ सोडण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे कारवाई होण्याच्या भीतीने आता स्वत:हून महिला अर्ज करून या योजनेचा लाभ सोडत आहेत. राज्यात आतापर्यंत ४ हजार महिलांनी अर्ज करून या जोजनेचा लाभ सोडून दिला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेने अर्ज व डॉक्युमेंटची फेरतपासणी होणार अशी चर्चा सुरू आहे. या योजनेच्या लभाबाबत काही तक्रारी सरकारला मिळाल्या. अनेकांनी पात्र नसतांना या योजनेचा लाभ घेतल्याचे पुढे आले. त्यामुळे त्या ठिकाणी अर्जांची फेरतपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने देखील संपूर्ण राज्यात लाभार्थी महिलांची सरसकट फेरतपासणी करण्याच्या विचारात आहे.
सरकारने अद्याप फेरतापासणी सुरू केलेली नाही. मात्र, ही तपासणी सुरू होईल या भीतीने आधीच काही महिलांनी अर्ज माघार घेण्यास सुरुवात केली आहे. आता पर्यंत राज्यात तब्बल ४ हजार महिलांनी अर्ज स्वत:हून अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे. या पूर्वी घेतलेल्या लाभाची वसूली व कारवाई होण्याच्या भीतीने ही अर्ज मागे घेतल्याचे बोलले जात आहे. पात्रता व निकषात न बसणाऱ्या महिलांनी हे अर्ज मागे घेतले आहेत. निवडणुकी आधी लाडकी बहीण योजने सर्वांना सरसकट पैसे मिळाले होते. मात्र, निवडणुकीनंतर फेरतपासणी केली जाण्याची चर्चा आहे.
त्यामुळे चार हजार महिलांनी फेरतपासणी आधी आम्हाला या योजनेचा लाभ नको असं म्हणत अर्ज दाखल करत यातून त्यांचं नाव मागं घेतलं आहे. या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. अर्जांची पडताळणी झाली तर अपात्र ठरून कारवाई होईल तसेच मिळालेले पैसे परत घेतले जाईल या भीतीने हे अर्ज मागे घेतले जात आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील अपात्र महिलांनी स्वतःहून ‘लाभ’ सोडण्यासाठी सरकारतर्फे आवाहन केले जाणार आहे. सरकार स्थापन झाल्यापासून अर्ज बाद होणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, अद्याप थेट अर्ज बाद करण्याबाबत राज्याकडून जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या नाहीत. मात्र, स्वतःहून जर कोणी लाभ सोडण्यासाठी अर्ज करत असेल तर त्यांचा अर्ज वगळण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या नावाने लॉगिन दिले जाणार असून, जिल्हापातळीवर नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यात यापूर्वी दोन महिलांनी या योजनेचा लाभ सोडला होता. त्यानंतर आता आणखी एका महिलेचा या योजनेचा लाभ सोडत असल्याचा अर्ज मिळाला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी जे. बी. गिरासे यांच्याकडे या महिलेने हा अर्ज केला आहे.
ज्या बहिणीला लाभ घेयचा नसेल त्यांना तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) किंवा जिल्हा परिषदेकडे लेखी अर्ज करावा लागणार आहे. त्यामध्ये योजनेचा अर्ज स्वतःहून सोडत असल्याचे लिहून द्यावे लागणार आहे. त्यांनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉगिनवरून आलेल्या अर्जातील नावे वगळण्याची प्रक्रिया होणार आहे.
संबंधित बातम्या