Konkan Railway: कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले! मुसळधार पावसामुळे कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस सुपर लेट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Konkan Railway: कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले! मुसळधार पावसामुळे कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस सुपर लेट

Konkan Railway: कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले! मुसळधार पावसामुळे कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस सुपर लेट

Published Jul 14, 2024 12:05 PM IST

Konkan Railway : कोकणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहेत. अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने या मार्गावरील अनेक गाड्या या विलंबाने धावत आहेत.

कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले! मुसळधार पावसामुळे कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस सुपर लेट
कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले! मुसळधार पावसामुळे कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस सुपर लेट

Konkan Railway : कोकणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहेत. अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने या मार्गावरील अनेक गाड्या या विलंबाने धावत आहेत. कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेससह आणखी काही एक्सप्रेस गाड्या या २ ते चार तास उशिराने धावत आहेत. तर काही गाड्या या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत.

कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. आजदेखील रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने कोकणासह वरील जिल्ह्यांना रेड अर्लट दिला आहे. मुंबई व ठाण्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

या पावसामुळे कोकण रेल्वेवर परिमाण झाला आहे. पावसामुळे काही ठिकाणी ट्रॅकवर पाणी साठले आहेत. तर काही ठिकाणी ट्रॅक खालील भरावा वाहून गेला आहे. यामुळे या मार्गाने धावणाऱ्या काही गाड्या या रद्द तर काही गाड्या या संथ गतीने पुढे जात आहेत. काही गाड्यांना पाच ते सात उशीर झाला आहे. कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेससह आणखी काही एक्सप्रेस गाड्या या २ ते चार तास उशिराने धावत आहेत. तर काही गाड्या या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. मुंबईच्या दिशेने जाणारी निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस सहा ते सात तास उशिराने धावते. तर इतर गाड्या अर्धा ते एक तासाने उशिराने धावत आहेत.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार रायगड आणि रत्नागिरी या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा या दोन जिल्ह्यांसाठी देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. येथील घाट विभागात जोरदार तर शहरी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत पावसाचा जोर कायम

मुंबईत देखील सकाळ पासून जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर तसेच उपनगरातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहून पावसाची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर