Kalyan Bus Fire : ५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चालत्या बसला अचानक आग, मोठा अनर्थ टळला
नवी मुंबई महापालिकेच्या बसलाकल्याणमध्ये आगलागल्याचे (Kalyan Bus Fire) खळबळजनक वृत्त समोर आले आहे. ५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसनेकल्याणच्या नेतिवली परिसरातअचानकपेट घेतला.
ठाणे – नवी मुंबई महापालिकेच्या बसलाकल्याणमध्ये आग लागल्याचे (Kalyan Bus Fire) खळबळजनक वृत्त समोर आले आहे. ५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने कल्याणच्या नेतिवली परिसरात अचानक पेट घेतला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रसंगावधान राखत चालक व वाहकांनी वेळीच बस थांबवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. चालक व वाहकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. (navi Mumbai municipal corporation bus) ही घटना बुधवारी रात्रीच्या वेळी घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालक व वाहकांनी प्रसंगावधान राखत बस रस्त्याकडेला उभी केली व सर्व प्रवाशांना बाहेर काढले. दरम्यान ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व भागातील नेतिवली परिसरात नवी मुंबई महापालिकेच्या बसने अचानक पेट घेतला. त्यावेळी या बसमध्ये जवळपास ५० लोक प्रवास करत होते. ही बस कल्याणहून नवी मुंबईच्या दिशेने चाललीअसताना चालत्या बसने पेट घेतला होता. चालक-वाहकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसला आग लागल्याचे पाहून बाहेरच्या लोकांनी आरडाओरड करून बस थांबवण्यास सांगितले.
संबंधित बातम्या
विभाग