Maharashtra Weather Updates: विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा, मुंबईत उकाडा कायम
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Updates: विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा, मुंबईत उकाडा कायम

Maharashtra Weather Updates: विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा, मुंबईत उकाडा कायम

Apr 12, 2024 06:58 AM IST

Maharashtra Temperature: विदर्भ,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, मुंबईत उकाडा कायम आहे.

राज्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.
राज्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. (HT)

Todays Weather Updates: राज्यातील तापमानात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.राज्यातील अनेक भागात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर, काही भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मुंबईसह बऱ्याच ठिकाणी उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने सरी कोसळत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

varandha ghat : वरंधा घाट 'या' कारणासाठी ३० मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोणत्या भागात पाऊस आणि कुठे पावसाचा इशारा?

चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे वादळी पाऊस आणि गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, जळगाव, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा या भागांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Pune OSHO Ashram : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला उच्च न्यायालयाचा दणका, पुण्यातील आश्रमाची जमीन विकण्याची मागणी फेटाळली

मुंबईत उकाडा कायम

राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात प्रचंड उकाडा जाणवत आहे. हे उष्ण वारे अरबी समुद्रावरुन महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यामुळं आर्द्रता प्रचंड वाढली. सांताक्रुझ येथे काल तब्बल ३३ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले. अरबी आणि हिंद महासागरात हवेच्या कमी दाबामुळं पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने मुंबईसह कोकणातील तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळते.

गुरुवारी नोंदवण्यात आलेले तापमान

पुणे (३९.५), अहमदनगर (३९.८), धुळे (४०.०), जळगाव (३८.०), जेऊर (४१.५), कोल्हापूर (३८.२), महाबळेश्वर (३३.४), मालेगाव (४२.०), नाशिक (३७.८), निफाड (३७.०), सांगली (३८.९), सातारा (३९.१), सोलापूर (४०.०), सांताक्रूझ (३३.०), डहाणू (३४.०), रत्नागिरी (३३.५), छत्रपती संभाजीनगर (३८.६), बीड (४०.५), धाराशिव (३९.५), परभणी (३८.३), अकोला (३८.३), अमरावती (३५.६), बुलढाणा (३३.८), ब्रह्मपूरी (३८.२), चंद्रपूर (३६.८), गडचिरोली (३५.०), गोंदिया (३५.४), नागपूर (३४.८), वर्धा (३५.८), वाशीम (३०.२), यवतमाळ (३६.५).

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर