मरण आलं तरी बेहत्तर पण दाऊदशी संबंध असणाऱ्यांशी.. एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी थेट ठाकरेंवर टीका केली आहे.
मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी थेट ठाकरेंवर टीका केली आहे. टीका करताना त्यांनी दाऊद आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर घणाघात केला आहे.
'मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…?यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल;आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..
'हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर....तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू...'असं ट्विट त्यांनी केलं आहे.शिंदे यांनी ट्वीट करत संजय राऊत यांनाही टॅग केलं आहे. तसेच त्यांनी या ट्विटसह #MiShivsainik हे हॅशटॅग ही जोडले आहे.
राऊत यांना शिंदेंचे प्रत्युत्तर -
दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना संजय राऊत म्हणजे होते की, ''४० आमदारांचे मृतदेह थेट गुवाहाटीमधून येतील. त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. गुवाहाटीमध्ये एक मंदिर आहे. या मंदिरात रेड्याचा बळी दिला जातो. आम्ही ४० रेडे पाठवले आहेत.'' राऊत यांनी केलेल्या याच वादग्रस्त वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं आहे.
शिंदे यांनी एकामागून एक असे दोन ट्वीट केलं आहे. आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये ते म्हणाले आहेत की, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू, असं ते ट्वीट करून म्हणाले आहेत.
संबंधित बातम्या
विभाग