Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपने देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात कार्यकर्त्यांना संबोधित केले. या मेळाव्यात फडणवीस यांनी विविध मुद्द्यावरून विरोधकांवर हल्लाबोल केला. आजची तारीख लिहून ठेवा. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, या विधासभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीतच सरकार निवडून येईल, असे फडणवीस म्हणाले. याशिवाय, गुरूपौर्णिमानिमित्त भाजपचा गुरू कोण आहे, हे देखील त्यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले की, 'गुरुपौर्णिमानिमित्त अनेकजण आपल्या गुरुचे दर्शन घेण्यासाठी जातात. कोण शेगाव, अक्कोलकोट तर कुणी शिर्डीला जाते. पण आपण आपला पक्षाच्या अधिवेशनात आलो आहोत. आपला गुरू कोण आहे? भगवा ध्वज आपला गुरू आहे. कारण हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा भगवा ध्वज प्रभू श्रीरामांचा आहे, हा भगवा ध्वज प्रभू श्रीकृष्णांचा आहे, हा भगवा ध्वज भारत मातेचा अखंड भारतमातेचा ध्वज आहे. या भगव्या ध्वजाला मी खऱ्या अर्थाने नमन करतो.'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, ही योजना जनतेची दिशाभूल करणारी आहे, असा आरोप महविकास आघाडीचे अनेक नेते करीत आहे. यावर फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'महाविकास आघाडीचा इतिहास हा योजना बंद करण्याचा आहे. आपल्या सरकारच्या सगळ्या चांगल्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या. तसेच लाडकी बहीण योजना फसावी, यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहेत', असे फडणवीस म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. तर, दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीका केली. 'आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले आणि ते उच्च न्यायालयात टीकवले. आम्ही सत्तेत असताना तीनवेळा मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला. पण दुर्देवाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले आणि मराठा आरक्षण रद्द झाले',असेही फडणवीस म्हणाले.
संबंधित बातम्या