Adani News : मुंबईतील २१ एकरांचा भूखंड अदानींना गिफ्ट; सरकारी GR ही निघाला, वर्षा गायकवाड यांचा आरोप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Adani News : मुंबईतील २१ एकरांचा भूखंड अदानींना गिफ्ट; सरकारी GR ही निघाला, वर्षा गायकवाड यांचा आरोप

Adani News : मुंबईतील २१ एकरांचा भूखंड अदानींना गिफ्ट; सरकारी GR ही निघाला, वर्षा गायकवाड यांचा आरोप

Updated Jun 13, 2024 11:25 PM IST

varsha gaikwad: कुर्ल्यातील मदर डेअरीची२१एकर जागा अदानीच्या घशात घालण्याचे सरकारी फर्मान काढले असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

वर्षा गायकवाड यांचा अदानींवर मोठा आरोप
वर्षा गायकवाड यांचा अदानींवर मोठा आरोप

धारावी प्रकल्प पुन्हा रेंगाळणार असल्याची चिन्हे दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी कुर्ला पूर्व येथील साडे आठ एकर जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पाला देण्यास विरोधकेल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी धारावी प्रकल्पासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीची २१ एकर जागा अदानीच्या घशात घालण्याचे सरकारी फर्मान काढले असल्याचा आरोप केला आहे. कोणतीही निविदा प्रक्रीया न राबवता कोट्यवधी रुपये किमतीची ही मोक्याची जागा नाममात्र दराने अदानीला भेट म्हणून दिली असून हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोपही वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

भाजपा सरकार अदानींवर पुन्हा मेहरबान झालं असून अदानींसाठी सत्ता राबवली जात असल्याचा घणाघातही वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मोदानी (मोदी आणि अदानी) अँड कंपनीला मुंबई गिळायची आहे. त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची त्याची तयारी आहे. मुंबईतील सर्व सरकारी जमीन अदानीची आहे,असा प्रकार सुरु आहे. भाजप सरकारने अदानींसाठी धारावी टेंडर आणि टीडीआर महाघोटाळा केला आणि धारावीकरांच्या अधिकारावर गदा आणली. त्यानंतर धारावी पुनर्वसनाच्या नावावर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मिठागरांच्या जमिनी व जकात नाक्यासाठी असलेली मुलुंड येथील महापालिकेची जागा आणि डम्पिंग ग्राउंडची जागा लाटण्याचा डाव आखला.

आता कुर्ला येथील मदर डेअरीची जागा यांना गिळंकृत करायची आहे. कुणालाही विश्वासात न घेता,कुठलीही जनसुनावणी न करता हा हिरवळीचा भूखंड अदानींच्या घशात घातला जात आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदानीला नाममात्र दराने हा भूखंड भेट दिला जात आहे. मात्र हा डाव हाणून पाडला जाईल, असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मदर डेअरीच्या कुर्ला येथील भूखंडावर ८०० ते ९०० झाडे आहेत. त्यामुळे हा परिसर पर्यावरणपूरक आणि संवेदनशील आहे. मात्र या झाडांची निर्दयीपणे कत्तल करून या इको-सेन्सिटिव्ह भूखंड अदानीला देण्याचे षडयंत्र आहे.या भूखंडावर आधी भाजपच्याच एका उच्चपदस्थ नेत्याचा डोळा होता. त्यासाठी येथे औद्योगिक संकुल उभारण्याचा खेळ मांडला होता. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली होती. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परम मित्र अदानींची या भूखंडावर नजर पडली आणि महसूल व दुग्धविकास विभागाने ही जागा अदानीच्या DRPPL ला भेट देण्याचा जीआर काढला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर