Child Suicide In Mumbai : मुंबई येथील मालाडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील मालवणीमध्ये मदरशात शिकणाऱ्या एका ११ वर्षांच्या मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्याने नेमके हे पाऊल का उचलले याचं कारण समोर आलं नाही. हा मुलगा त्याकह्या भावासोबत मदरसामध्ये शिकत होता. शनिवारी संध्याकाळी मदरसामध्ये असलेल्या बाथरुमचा दरवाजा बंड करून त्याने गळफास घेतला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी पंचनामा करत मुलाचा मृतदेह शताब्दी रुग्णालयामध्ये पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मदरसामध्ये मुलांना शिकवणारे मौलानाने मुलासोबत मारहाण केली का? त्याने या पद्धतीचे टोकाचे पाऊल का उचलले ? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. तयादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
या लहान ११ वर्षाच्या मुलाने अशा पद्धतीने जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लहान वयात मुलाने आत्महत्या का केली असावी? असे सवाल उपस्थित केले जात आहे. या घटनेमुळे चर्चांना उधाण आले आहे. तर अनेक जण तर्क वितर्क लढवत आहेत. शवविच्छेदन अहवाल अद्याप आला नाही. हा अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मुलाने टोकाचे पाऊल का उचलेले आहे? त्याच्यावर काही दबाव होता का? याबाबतचा पोलिस तपास करत आहेत. त्याच्या कुटुंबीयांना व मदरशातील त्याच्या शिक्षकांना व मुलांकडे चौकशी केली जात आहे.
संबंधित बातम्या