छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण रस्त्यावरील वाल्मी नाकाजवळ भीषण अपघात झाला आहे. सोलापूरहून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्यात थांबलेल्या अनेक वाहनांना उडवले. यात जवळपास १० ते १५ पेक्षा अधिक वाहनचालक गंभीर जखमी झाले असून एक महिला ठार झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळी वाहनांच्या काचांचा ढीग साचला होता.
भरधाव ट्रकने चार ते पाच मोटार सायकलींसह अनेक चारचाकी वाहनांनाही जोरदार धडक दिली. यामध्ये एक महिला जागीच ठार झाल्याची बोलले जात आहे. अपघानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार धुळे सोलापूर महामार्गावरून ट्रक पैठण रोडवर उतरत होता. त्यावेळी उतारावरून ट्रक खाली येत असताना ट्रकने ३ कार, ७ दुचाकी आणि एका रिक्षाला धडक दिली.
पैठण मार्गावरील वाल्मी नाक्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहने मंद गतीने पुढे जात होती. दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी सोलापुर धुळे महामार्गावरुन आलेल्या सुसाट ट्रकने पुढे उभ्या असलेल्या अनेक वाहनांना उडवलं.
घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. एकमेकांमध्ये अडकलेली वाहने बाहेर काढण्यात बराच वेळ लागला. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
संबंधित बातम्या