मुंबईमध्ये कधीपर्यंत धावणार बुलेट ट्रेन, कुठंपर्यंत पोहोचलं काम?; रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितलं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईमध्ये कधीपर्यंत धावणार बुलेट ट्रेन, कुठंपर्यंत पोहोचलं काम?; रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितलं

मुंबईमध्ये कधीपर्यंत धावणार बुलेट ट्रेन, कुठंपर्यंत पोहोचलं काम?; रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितलं

HT Marathi Desk HT Marathi
Updated May 04, 2025 01:20 PM IST

Mumbai Bullet Train : भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प (मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर) देशाच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. ५०८ किमी लांबीचा हा कॉरिडॉर जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाची पाहणी करताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव.  (Photo by Raju Shinde/HT Photo)
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाची पाहणी करताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव. (Photo by Raju Shinde/HT Photo) (Hindustan Times)

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मुंबईतील बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनच्या पहिल्या स्थानकाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील निर्माणाधीन भूमिगत स्थानकाला भेट देऊन तेथील प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी नवी मुंबईतील पनवेल आणि जुईनगर रेल्वे स्थानकांवर सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांची पाहणी केली. रेल्वे आणि मालवाहतुकीच्या प्रमुख प्रकल्पांच्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. बीकेसीच्या दौऱ्यात रेल्वेमंत्र्यांसोबत नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएचएसआरसीएल) अधिकारी, तसेच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे प्रतिनिधी उपस्थित होते. एनएचएसआरसीएल ५०० किलोमीटर लांबीचा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राबवित आहे.

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सर्वात खालच्या 'बी ३ बेसमेंट लेव्हल'चे काम पूर्ण झाले आहे. बीकेसीतील बुलेट ट्रेनच्या पहिल्या स्थानकाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. स्थानकाच्या भिंतीचे काम सुरू झाले असून बोगद्याचे कामही वेगाने सुरू आहे. भुयारी मार्गाच्या पलीकडे भूसंपादनानंतर महाराष्ट्र विभागातील सर्व बांधकामे वेगाने सुरू आहेत. मंत्री म्हणाले की, बीकेसी स्थानकात बहुमजली इमारतीचे नियोजन करण्यात आले आहे.

बुलेट ट्रेन स्टेशनमध्ये खोदकाम ७६ टक्के पूर्ण -

एनएचएसआरसीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की बीकेसी बुलेट ट्रेन स्टेशनवर सुमारे ७६ टक्के खोदाईचे काम पूर्ण झाले आहे. पाहणीनंतर मंत्री पुण्याला रवाना झाले, तेथे त्यांनी सायंकाळी लांब पल्ल्याच्या दोन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२८ पर्यंत महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी घोषणा केली होती. पनवेल रेल्वे स्थानकाला भेट दिल्यानंतर वैष्णव यांनी महत्त्वाचे विधान केले. आगामी दशकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुंबईची रेल्वे क्षमता वाढविणे आणि स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाची त्यांनी माहिती दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर