Buldhana crime news : बुलडाण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने नातेवाईकांच्या दोन चिमुकल्या मुलांचेअपहरण (kidnapping) केले. यातील एका मुलाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले असून दुसरा मुलगा अद्याप बेपत्ता आहे. पोलिस बेपत्ता मुलाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गावात राहणाऱ्या नातेवाईकानेच या मुलांचे अपहरण करून त्यातील एकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेचा तपास केला जात आहे.
बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावात ही घटना घडली. या गावातील दोन मुले दोन दिवसांपासून बेपत्ता होती. त्यातील अरहान शेख हारून या १० वर्षीय मुलाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. तर दुसरा १४ वर्षाचा मुलगा अजूनही बेपत्ता आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे.
पोलिसांकडून चिमुकल्याचा शोध घेतला जात असून त्याच गावामध्ये राहणाऱ्या नातेवाईकावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी शेख अन्सारला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने अपहरण करून अरहानचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने अरहानचा मृतदेह उकिरड्यात पुरला असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अरहानचा मृतदेह रात्रीच उकिरड्यातून काढून ताब्यात घेतला. आरोपी शेख अन्सार शेख नसीर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पुण्यातील बोपोडी परिसरात एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाने नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे. व्यवस्थापकाकडून सर्वांसमोर अपमान व कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात होती. मॅनेजरच्या सततच्या छळाला कंटाळून त्याने टोकाचं पाऊल उचललं. विशाल प्रमोद साळवी (वय ३६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना २१ जून रोजी घडली होती मात्र महिन्याभरानंतर याबाबत तक्रार नोंदवली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, याप्रकरणी येरवडा येथील आयटी कंपनीचा मॅनेजर झिशान हैदर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या