मुंबई : शिक्षण क्षेत्रात सुरू असलेला मोठा भ्रष्टाचार खुद्द शिक्षण आयुक्तांनी पुढे आणला आहे. राज्यातील अनेक शिक्षणाधीकारी शिक्षणाचा बाजार करत असून मोठ्या प्रमाणात लाच स्वीकारली जात आहे. तसेच शिक्षकांकडून संचित रजा मंजूर करून घेण्यासाठी बदल्यांसाठी पैसे घेत असल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान, आयुक्त सुरज मांढरे यांनी ३६ शिक्षणंधिकाऱ्यांची नावे लाचलुचपत विभागाला दिली आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, ते लाचखोर ३६ शिक्षणाधीकारी कोण या बाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून भ्रष्ट कारभार सुरू आहे. शिक्षक बदल्यांसाठी अनेक अधिकारी आणि कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात या पूर्वी अडकले आहेत. शिक्षक बदलीच्या फायली पुढे सरकवण्यासाठी पैसे घेतले जात आहे. यासाठी दरपत्रक देखील ठरले आहे. शिक्षकांच्या संचित रजा मंजूर करण्यासाठी देखील पैसे घेतल्या जातात.
लिपिका पासून ते अधिकाऱ्यापर्यंत यात सर्व सामील असल्याने हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी मोहीम हाती घेतली आहे. या साठी त्यांनी राज्यातील तब्बल ३६ शिक्षकांची नावे असलेले एक पत्र एसीबीला दिले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शिक्षण क्षेत्रात कायम मुख्याध्यापक मान्यतेसाठी एक ते दीड लाख रुपयांची मागणी केली जाते. तर शालार्थ प्रकरणांसाठी ८० ते १ लाख रुपये घेतले जातात. तर मेडिकल बिल मंजुरीसाठी बिलाच्या रकमेच्या ५ ते २० टक्क्यांपर्यंत पैसे घेतल्या जातात. शिक्षक बदलीसाठी ५० ते २ लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले जातात.
संबंधित बातम्या