Amravati Accident: लग्नावरून परत येणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; दर्यापूर-अंजनगाव मार्गावर भीषण अपघातात पाच ठार, ७ जखमी
Amravati Accident: आज सकाळी मुंबई-नागपुर मार्गावरील अपघातात ५ जण ठार झाल्याची घटना ताजी असतांना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर-अंजनगाव मार्गावर दूसरा भीषण अपघात झाला आहे. यात एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले आहेत.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर - अंजनगाव मार्गावर लेहगावजवळ सोमवारी रात्री ११ च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात लग्नावरून परत येत असलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले तर ७ जण जखमी झाले आहेत. हे कुटुंबीय लग्नासाठी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव - सुरजी येथे गेले होते. दरम्यान, परत येत असतांना एका मोठ्या ट्रकने त्यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. मृत कुटुंबियांची नावे समजू शकली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार दर्यापूर येथील एक कुटुंबीय लग्नासाठी अंजनगाव - सुरजी येथे गेले होते. एका खासगी गाडीने १२ जण लग्नासाठी गेले होते. दरम्यान, मंगळवारी रात्री ते लग्न आटोपून घरी परत येत होते. त्यांची गाडी दर्यापूर - अंजनगाव मार्गाने परत येत असतांना लेहगावजवळ एका मोठ्या ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली.
ही धडक एवढी भीषण होती की गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले. जखमींवर अमरावती जिल्हा रुग्णालयात पुढील उपचार सुरु आहेत. जखमी आणि मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या आपघताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. जखमींना तातडीने त्यांनी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.