शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी मोठा निकाल देताना शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा देत भरत गोगवलेंचा व्हीप वैध असल्याचा निकाल दिला. यामुळे शिंदे गटातील सर्व आमदार पात्र ठरले आहेत. नार्वेकरांच्या या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषद घेत व्हिडिओ पुरावे जनतेसमोर सादर केले. या पत्रकार परिषदेत वकील असीम सरोदे यांनी नार्वेकर यांच्या निर्णयांची चिरफाड करत अनेक मुद्दे मांडले.
जर कोणाला राजकीय पक्ष सोडायचा असेल तर ते पक्ष सोडू शकतात, पण त्या आधारे ते अपात्र ठरतात. पक्षाच्या व्हिपचे त्यांना पालन करावे लागते. नसेल तर ते आमदार, खासदार अपात्र ठरू शकतो. मात्र कायद्याच्या दृष्टीकोनातून एकूण संख्येच्या दोन तृतियांश आमदार फुटले तर त्यांना पक्षांतर बंदी लागू होत नाही.
एकनाथ शिंदे गेले त्यावेळी त्यांच्यासोबत फक्त १६ आमदार होते. नंतर त्यांनी तिथे अनेकांना आमंत्रित केलं व अमिषे दाखवून त्यांच्यावर दबाव टाकला, त्यांची फाईल तयार होती, त्यांना भीती दाखवली आणि काहीजण सुरतला जाऊन त्यांना मिळाले काहीजण गुवाहाटीला जाऊन मिळाले. नंतर ते मुंबईला आले आणि मुंबईत काही जण त्यांना जाऊन मिळाले. अशा पद्धतीने त्यांच्याकडे ३८ ते ४० आमदारांचे पाठबळ झाले आहे.
संबंधित बातम्या