Dharavi Project : अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखला जाणार प्रोजेक्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dharavi Project : अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखला जाणार प्रोजेक्ट

Dharavi Project : अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखला जाणार प्रोजेक्ट

Dec 30, 2024 05:05 PM IST

Adani Dharavi Project : अदानी समूहाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नाव बदलून नवभारत मेगा डेव्हलपर्स (Navbharat Mega Developers) असे केले असून, या बदलामुळे धारावी बचाव आंदोलनाकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे.

धारावी प्रकल्पाचे नाव बदलले
धारावी प्रकल्पाचे नाव बदलले (PTI)

Dharavi Project : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा कालापालट करण्यासाठी अदानी समूह लवकरच आपल्या प्रकल्पाचे काम सुरू करणार आहे. अदानी उद्योग समूह धारावीचा पुनर्विकास करणार असून या प्रकल्पावरून राज्यात बराच वाद निर्माण झाला आहे. धारावी प्रकल्पाचे टेंडर अदानी समूहाला दिल्याचा उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीतील नेत्यांनी विरोध केला आहे. या प्रकल्पाबाबत राज्यात बरेच राजकारण सुरू असताना या प्रकल्पाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अदानी समूहाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नाव बदलले आहे.

आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडचे (DRPPL) नाव बदलून नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (NMDPL) असे करण्यात आले आहे.

नामांतरामागचे कारण स्पष्ट करताना अदानी समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की, आधुनिक, सर्वसमावेशक आणि गतिमान समुदाय तयार करण्याच्या कंपनीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी हे रिब्रँडिंग करण्यात आले आहे. हा बदल देशभरातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाच्या विशाल आणि ऐतिहासिक कार्याशी संबंधित किंवा लाभार्थी प्रत्येकासाठी व्यापक आणि उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी कंपनीचा नवीन दृष्टीकोन आणि दायित्व दर्शवितो, असे निवेदनात म्हटले आहे.

नामांतराबाबत प्रतिक्रिया देताना डीबीएचे समन्वयक राजू कोरडे म्हणाले की, नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड (Navbharat Mega Developers) ही अदानीची जुनी कंपनी असल्याने हे नवीन नाव नाही. दरम्यान, धारावी पुनर्विकास प्रकल्पात अदानी समूहाचा ८० टक्के आणि महाराष्ट्र सरकारचा २० टक्के वाटा आहे. नवीन नावाच्या कंपनीतील शेअरहोल्डिंग अपरिवर्तित राहणार आहे. धारावीही जगातील सहावी सर्वात दाट लोकवस्ती आहे. यात गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील लोकांची मोठ्या प्रमाणावर वसाहत आहे.

अदानी समूहाच्या निवेदनात म्हटले आहे की, नाव बदलल्याने सरकारची महत्त्वाची भूमिका किंवा प्रकल्पाचा मूळ हेतू बदलणार नाही. धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी सांभाळणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाची चूक होऊ नये, यासाठीही नामांतराचा निर्णय घेण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर