warkari bus accident : पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला! मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात ५ ठार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  warkari bus accident : पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला! मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात ५ ठार

warkari bus accident : पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला! मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात ५ ठार

Updated Jul 16, 2024 09:07 AM IST

Accident On Mumbai Pune Expressway : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या वारकऱ्यांच्या एका बसचा भीषण अपघात झाला असून त्यात ५ जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाले आहेत.

पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला! मुंबई पुणे एसप्रेसवेवर भीषण अपघात पाच ठार
पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला! मुंबई पुणे एसप्रेसवेवर भीषण अपघात पाच ठार

Accident On Mumbai Pune Expressway : राज्यात उद्या आषाढी एकादशी निमित्त हजारो वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री १ च्या सुमारास वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे. डोंबिवली येथून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची ट्रॅव्हलबस ट्रॅक्टरला जोरदार धडकली असून या भीषण अपघात पाच जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहेत. जखमींना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहेत. अपघातातील मृतांची नावे अद्याप समजू शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार आषाढी वारी निमित्त डोंबिवली येथून काही वारकरी हे एका ट्रॅव्हल बसने पंढरपूरला निघाले होते. या बसमध्ये ५४ प्रवासी होते. गाडीत विठ्ठलाच्या नामघोषात सुरू होता. मात्र, अचानक एक ट्रॅक्टर वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल बसला धडकला. हा अपघात ऐवढा भीषण होता की यात पाच जण जागीच ठार झाले तर २० ते २५ जण जखमी झले आहेत. यातील काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे.

कसा झाला अपघात ?

डोंबिबली येथून एका वारकऱ्यांच्या समूह हा पंढरपूरला ट्रॅव्हल्सने जात होते. गाडीत ५४ वारकरी प्रवास करत होते. रात्री सर्व जण निघाले होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांची ट्रॅव्हल्स ही मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन पंढरपूरला जात होती. यावेळी ट्रॅव्हल्ससमोर एक ट्रॅक्टर भरधाव वेगात जात होता. या ट्रॅव्हल्स वरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने ट्रॅव्हल्स ही ट्रॅक्टरला जाऊन धडकली. व रस्त्याखाली थेट ३० ते ४० फूट खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात ५ जण ठार झाले तर २० ते २५ जण जखमी झले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने बचावकार्य राबावत जखमी नागरिकांना जवळील एमजीएम रूग्णालय तसेच पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी आहे. मात्र, असे असतांना या मार्गावरून ट्रॅक्टरला जाण्यास परवानगी कशी देण्यात आली या बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर