Panvel: विधवा वहिनीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता दीर, किरकोळ कारणांवरून झाला वाद, केली तिची हत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Panvel: विधवा वहिनीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता दीर, किरकोळ कारणांवरून झाला वाद, केली तिची हत्या

Panvel: विधवा वहिनीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता दीर, किरकोळ कारणांवरून झाला वाद, केली तिची हत्या

Published Oct 24, 2024 11:43 AM IST

Panvel Man Kills Live-In Partner: पनवेलमध्ये एका व्यक्तीने दारूच्या नशेत लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याची घटना उघडकीस आली.

पनवेल: किरकोळ वादातून लिव्ह इन पार्टनरची हत्या
पनवेल: किरकोळ वादातून लिव्ह इन पार्टनरची हत्या

Panvel Murder News: पनवेलमध्ये दारूच्या नशेत लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. मृत महिला आरोपीच्या मयत भावाची पत्नी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघे सोबत राहत होते. त्यांच्यात मंगळवारी रात्री किरकोळ कारणांवरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने आरोपीने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

शनिवरी गोमा निरगुडा (वय, ४५) असे मृत महिलेचे नाव असून गेल्या काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. तर, आरोपी कमल्या रागो निरगुडा (वय, ५५) हा मृत महिलेच्या पतीचा धाकटा भाऊ आहे. कमल्या याला २००८ मध्ये पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक झाली होती. जवळपास पाच वर्ष तो तरुंगात होता. तरुंगातून बाहेर आल्यानंतर तो शनिवरी हिच्यासोबत राहू लागला. मिळालेल्या माहितीनुसार, कमल्या आणि शनिवरी यांच्यात मंगळवारी किरकोळ कारणांवरून वाद झाला. या वादातून कमल्या याने शनिवरीवर धारदार शस्त्राने हल्ला केला, ज्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्चना कुदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मृत महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. गुन्ह्याच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांना तपासातून उघड झाले. आरोपी जामिनावर सुटला आहे की त्याची शिक्षा पूर्ण झाली आहे, याची पोलीस चौकशी करीत आहेत. आरोपीला कलम १०३, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) हत्या आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत अटक करण्यात आली.

 

बायकोला घेऊन पळून गेलेल्या तरुणाच्या वडिलांची हत्या

उत्तर प्रदेशातील एटा मध्ये बायकोला घेऊन पळून गेलेल्या तरुणाच्या वडिलांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृताचा मुलगा आरोपीच्या पत्नीसोबत दिल्लीला पळून गेला आणि तिथे त्यांनी लग्न केल्याचे समजल्यानंतर आरोपीला राग अनावर झाला. आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपीने तरुणाच्या वडिलांना गोळ्या घातल्या. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे समजत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर