राजकारणाच्या वर देश असतो
राजकारणाच्या वर देश असतो, देशातील लोकांच्या भावना असतात, त्यांचा आदर केला पाहिजे, असे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरूच राहिल, पण...
भ्रष्टाचाराविरोधात आमची लढाई सुरूच राहिल. पण ही लढाई म्हणजे देशात आणीबाणी लागू करण्यासारखे नाही. कोणालाही शिक्षा द्यायचे काम न्यायपालिकेचे आहे. जर न्यायपालिका कोणाला जामीन देत असेल, तर त्याने एन्जॉय करावे. कोणालाही बळजबरीने आम्ही कोठडीत डांबणार नाही.
मेक इन इंडियाची चेष्टा करून काहीच उपयोग नाही
मेक इन इंडियाची चेष्टा करून काहीच उपयोग होणार नाही. फक्त रात्री चांगली झोप लागेल. पण देशाचे काहीच भले होणार नाही.
जलसंकटाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे
जलसंकटाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. यासाठीच आम्ही जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली आहे.
सत्तेत असताना सबका साथ घेण्याचे शक्य तेवढे सर्व प्रयत्न आम्ही केले
सत्तेत असताना 'सबका साथ' घेण्याचे शक्य तेवढे सर्व प्रयत्न आम्ही केले आहेत.
देशात आणीबाणी कोणी लागू केली होती?
PM Modi in Lok Sabha: Who did it? Who did it? was being asked by some people during the debate. Today is 25th June. Who imposed the Emergency? We can't forget those dark days. pic.twitter.com/vLQLg96QD0
— ANI (@ANI) June 25, 2019
देशासाठी जगण्याची भावना लोकांमध्ये निर्माण करण्याची वेळ
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना देशासाठी जगण्याची भावना लोकांमध्ये निर्माण करण्याची वेळ आली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
आणीबाणीच्या वेळी २५ जूनच्या रात्री देशाच्या आत्म्याला पायदळी तुडविण्यात आले
आणीबाणीच्या वेळी २५ जूनच्या रात्री देशाच्या आत्म्याला पायदळी तुडविण्यात आले होते, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. न्यायालयाचा अनादर म्हणजे काय याचे ते तंतोतंत जुळणारे उदाहरण आहे.
आम्ही कोणतेही निर्णय घेताना फक्त कुटुंबाचा विचार करीत नाही
आम्ही कोणतेही निर्णय घेताना फक्त कुटुंबाचा विचार करीत नाही. म्हणूनच आम्ही माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कामांचा विचार करून त्यांना भारतरत्न दिले.
विरोधकांनी एकदा तरी मनमोहन सिंग, नरसिंह राव यांचे नाव घ्यायला हवे होते
विरोधकांनी आपल्या भाषणात एकदा तरी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, नरसिंह राव यांचे नाव घ्यायला हवे होते, असे मला वाटते. मी माझ्या भाषणात जुन्या सरकारांच्या चांगल्या कामांचा उल्लेख केला आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
आम्हाला उंच व्हायचेच नाही
उंच व्हायचे आमचे स्वप्नच नाही. जमिनीशी नाते सांगण्याची आमची इच्छा आहे.
कोणाची रेषा लहान करण्याचे काम आम्ही करीत नाही
कोणाची रेषा लहान करण्याचे काम आम्ही करीत नाही. आम्ही आमची रेषा मोठी करण्याचे काम करण्यासाठी आयुष्य समर्पित करतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
७० वर्षांतील विकासाचा अनुशेष ५ वर्षांत पूर्ण करणे कठीण
७० वर्षांतील विकासाचा अनुशेष ५ वर्षांत पूर्ण करणे कठीण असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
PM Narendra Modi in Lok Sabha: I never think about polls in terms of victory and defeat. The opportunity to serve 130 crore Indians and work to make a positive difference in the lives of our citizens is special to me. pic.twitter.com/4UVwOvEvE7
— ANI (@ANI) June 25, 2019
प्रतापचंद्र सरंगी यांच्या भाषणानंतर मी काहीच बोलण्याची गरज नाही
केंद्रीय मंत्री प्रतापचंद्र सरंगी यांनी आपल्या भाषणात महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या भाषणानंतर खरंतर मी काहीच बोलले नाही तरी चालेल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे
मतदारांनी जागरुकपणे मतदान केले
देशातील मतदारांनी विचार करून, सर्व माहिती घेऊन मगच मतदान केले आहे
खूप वर्षांनी देशाने मजबूत जनादेश दिला
खूप वर्षाने देशाने एक मजबूत जनादेश दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मतदाता जागरूक आहे. तो आपल्यापेक्षा आपल्या देशावर प्रेम करतो, हे या निवडणुकीतून दिसून आले.