दुसऱ्या टी-२० सामन्यातील विजयासह भारताची मालिकेत १-१ अशी बरोबरी
राजकोटच्या मैदानातील विजयासह भारताने बांगलादेश विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
रोहित शर्मा ८५ (४३)
शिखर धवन ३१ (२७)
श्रेयस अय्यर २४ (१३)*
लोकेश राहुल ८ (११)
----------------------------------
अमिनूल इस्लाम २/२९
सलामीवीर रोहित शर्माचे पाचवे शतक हुकले
रोहित शर्मा ४३ चेंडूत ८५ धांवाची खेळी करुन माघारी, अमिनुल इस्लामने त्याला झेलबाद केले.
धवनच्या रुपात भारताला पहिला धक्का
सलामीवीर धवनने २७ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ३१ धावांचे योगदान दिले. अमिनुल इस्लामने त्याला बोल्ड केले.
रोहितने षटकाराने साजरे केले अर्धशतक
रोहित शर्माने २३ चेंडूत अर्धशतक साजरे केले. हुसेनच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचत त्याने अर्धशतक पूर्ण केले.
रोहित धवन यांच्यात अर्धशतकी भागीदारी
रोहित-धवन यांच्यात अर्धशतकी भागीदारी
That's a solid 50-run partnership between #TeamIndia openers @ImRo45 & @SDhawan25 after 5.2 overs.
— BCCI (@BCCI) November 7, 2019
Live - https://t.co/skySZewy1g #INDvBAN pic.twitter.com/eldoMjZrmo
रोहित-धवन जोडीने केली भारताच्या डावाला सुरुवात
सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताच्या डावाला सुरुवात केली. रोहित शर्माचा हा १०० वा टी-२० सामना आहे.
निर्धारित २० षटकात बांगलादेश ६ बाद १५३ धावा
मोहम्मद नैम ३६ (३१)
सौम्य सरकार ३० (२०)
महमदुल्ला ३० (२१)
---------------------
युजवेंद्र चहल २/२८
चाहरने महमदुल्लाला धाडले माघारी, भारताला सहावे यश
बांगलादेशचा कर्णधार महमुल्लाने २० चेंडूत ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
भारताला पाचवे यश,
खलील अहमदच्या षटकात अफिफ हुसेन रोहित शर्माच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. त्याने संघाच्या धावसंख्येत अवघ्या ६ धावांची भर घातली.
बांगलादेशचा चौथा गडी माघारी
चहलच्या गोलंदाजीवर यष्टिमागे पंतची उत्कृष्ट कामगिरी, सौम्य सरकारच्या रुपात भारताला चौथे यश
भारताला तिसरे यश, मुशफिकर रहिम माघारी
धोकादायक मुशफिकर चहलच्या जाळ्यात, अवघ्या चार धाव करुन तंबूत. उल्लेखनिय आहे पहिल्या सामन्यात त्याने ६० धावांची खेळी केली होती. या सामन्यात क्रुणालने त्याचा झेल सोडला होता. आजच्या सामन्यात क्रुणालने आपली चूक सुधारत त्याचा झेल टिपला.
वाशिंग्टनने भारताला मिळवून दिले दुसरे यश
नैमच्या रुपात युवा फिरकीपटू वाशिंग्टनने बांगलादेशला दुसरा धक्का दिला. नैमने ३१ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने ३६ धावांचे योगदान दिले.
भारताला पहिले यश, लिटन दास माघारी
पंतचे चपळ क्षेत्ररक्षण, चोरटी धाव घेण्याच्या नादात लिटन दासने फेकली विकेट. त्याने मोहम्मद नैमसोबत ६० धावांची भागीदारी रचली. त्याने २९ धावांचे योगदान दिले.
बांगलादेशची दमदार सुरुवात
मोहम्मद नैम आणि लिटन दास यांनी पहिल्या पाच षटकात 41 धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली.
Bangladesh are 41/0 After 5 overs. Naim (26*) and Liton (15*) are at the crease.#BANvIND #RiseOfTheTigers pic.twitter.com/VSPq9sWkQx
— Bangladesh Cricket (@BCBtigers) November 7, 2019
नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
राजकोटच्या मैदानात भारतीय संघाचा कार्यवाहू कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माचा हा १०० वा सामना आहे.
.@ImRo45 is all set to play his 100th T20I tonight. Watch the Hitman share his thoughts on his memorable journey so far - by @28anand #TeamIndia pic.twitter.com/niSC8Gg0ZQ
— BCCI (@BCCI) November 7, 2019