Chanakya Niti: मुलांना यशस्वी बनवायचं आहे? मग शिकवा 'या' गोष्टी, वाचा काय सांगते चाणक्य नीती
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: मुलांना यशस्वी बनवायचं आहे? मग शिकवा 'या' गोष्टी, वाचा काय सांगते चाणक्य नीती

Chanakya Niti: मुलांना यशस्वी बनवायचं आहे? मग शिकवा 'या' गोष्टी, वाचा काय सांगते चाणक्य नीती

Published Oct 08, 2024 07:53 AM IST

Chanakya Niti Marathi: कोणताही पालक आपल्या मुलांच्या शिक्षणापूर्वी किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करण्याआधी अजिबात संकोच करत नाही.

Chanakya Niti in Marathi
Chanakya Niti in Marathi

Thoughts of Acharya Chanakya:  आपल्या मुलाने आयुष्यात नेहमी यशस्वी व्हावे आणि त्यांना प्रत्येक आनंद मिळावा, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व पालक आपल्या मुलांना लहानपणापासूनच अनेक गोष्टी शिकवू लागतात. याचे कारण असे की, कोणताही पालक आपल्या मुलांच्या शिक्षणापूर्वी किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करण्याआधी अजिबात संकोच करत नाही. तुम्ही तुमच्या मुलांना कितीही महागड्या शाळेत पाठवलेत, त्यांच्या सर्व गरजा तुम्ही पूर्ण केल्या तरीही काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही लहानपणापासूनच मुलांना शिकवल्या पाहिजेत. या गोष्टी शिकूनच तुमचे मूल आयुष्यात प्रत्येक प्रकारचे यश मिळवू शकते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्या तुम्ही लहानपणापासूनच तुमच्या मुलांना शिकवल्या पाहिजेत. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.

मुलाच्या प्रेमात कोणतीही कमतरता नसावी-

आचार्य चाणक्य यांच्या मते, तुम्ही तुमच्या मुलांचे संगोपन नेहमी प्रेमाने आणि काळजीने करावे. तुमच्या मुलांना घरात सुरक्षित वाटण्यासाठी असेच वातावरण तयार करा. त्यांचे पालक त्यांच्यावर किती प्रेम करतात हे त्यांना नेहमी जाणवले पाहिजे. जेव्हा तुम्ही याची काळजी घेता, तेव्हा तुमची मुले त्यांचे जीवन मोकळेपणाने आणि चांगल्या पद्धतीने जगू शकतात, ज्यामुळे त्यांना जीवनात यश मिळवणे खूप सोपे होते.

मोठ्यांचा आदर करणे-

आचार्य चाणक्य यांच्या मते, पालकांनी आपल्या मुलांना नेहमी सर्वांचा आदर करण्यास शिकवले पाहिजे. तुमच्या मुलांना त्यांच्या वडीलधाऱ्यांचा आणि त्यांच्यापेक्षा वयाने किंवा पदाच्या बाबतीत लहान असलेल्यांचा आदर करायला शिकवा. जर तुमच्या मुलाने या गोष्टी बालपणातच शिकल्या तर त्याला सर्वत्र आदर मिळतो.

योग्य आणि अयोग्य यातील फरक-

चाणक्य नीतीनुसार, पालकांनी आपल्या मुलांना लहानपणापासूनच योग्य आणि अयोग्य, धर्म आणि अधर्म यातील फरक सांगायला हवा. जेव्हा पालक आपल्या मुलांना लहानपणापासूनच या गोष्टींचे ज्ञान देतात तेव्हा भविष्यात त्यांचे चारित्र्य अधिक चांगले बनते आणि अशी मुले त्यांच्या कुटुंबाला नेहमीच गौरव देतात.

खरे बोलण्याची सवय-

आचार्य चाणक्य यांच्या मते, पालकांनी आपल्या मुलांना अगदी बालपणापासूनच खरे बोलण्याची सवय लावावी. अगदी लहान-लहान गोष्टींमध्ये त्यांना खोटे बोलण्यापासून रोखावे. असे केल्याने तुमची मुले कधीही खोटे बोलणार नाहीत. खोत बोलल्याने काही वेळ आनंद मिळेल, परंतु त्यानंतर सत्य त्यांची नाचक्की होईल. शिवाय इतरांचा त्यांच्यावरील विश्वास उडेल. आणि त्यांना अपमानित व्हावे लागेल. अशा परिस्थिती त्यांच्या करिअरवर नकारात्मक परिणाम पडेल.त्यामुळे त्यांची प्रगती होणार नाही.

 

 

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner