Unknown Facts About Kitchen : आपल्या स्वयंपाक घरात असे अनेक मसाले असतात, जे वर्षानुवर्षे डब्यात बंद राहिले तरीही ते खराब होत नाहीत. त्यांना कधीच एक्सपायरी डेट नसते. अशा गोष्टी तुम्ही सहज कोणतही टेंशन न घेता वापरू शकता. जर, तुम्ही देखील काही गोष्टी खराब झाल्या असे समजून फेकून देत असाल, तर थांबा आणि आधी 'या' गोष्टी जाणून घ्या.
तुम्हाला माहिती आहे का की, तांदळाला कधीच एक्सपायरी डेट नसते? ते खराब होण्यापासून रोखण्यासाठी, तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. तांदूळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरावा. तांदळाला ओलावा लागण्यापासून दूर ठेवा. सुके तांदूळ तुम्ही वर्षानुवर्षे सहज वापरू शकता.
साखर आणि मीठ देखील वर्षानुवर्षे वापरले जाऊ शकतात. कारण, या दोन्ही गोष्टी खराब होत नाहीत. या दोन्ही गोष्टी खराब होऊ नयेत म्हणून, तुम्ही त्या हवाबंद डब्यात साठवाव्यात. याशिवाय, त्या वापरण्यासाठी तुम्ही कोरड्या चमच्याचा वापर करावा. जर तुम्ही त्यांना पाणी किंवा ओलाव्यापासून वाचवू शकलात, तर या दोन्ही गोष्टी अनेक वर्षे खराब होणार नाहीत.
स्वयंपाकघरात ठेवलेला सोया सॉस अनेक वर्षे वापरता येतो. सोया सॉसमध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम आढळते, ज्यामुळे ते कधीच खराब होत नाहीत. सोया सॉस साठवण्यासाठी तुम्ही काचेच्या बाटलीचा वापर करू शकता. सोया सॉस थंड आणि कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी साठवून त्याचे शेल्फ लाईफ वाढवता येते. व्हिनेगरचा वापरही बराच काळ करता येतो. व्हिनेगर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते.
मध देखील कधीच खराब होत नाही. कालांतराने तो स्फटिकरूप होण्याची शक्यता असते, पण तो खराब होत नाही. मुळात, मधात सुमारे १७% पाणी असते, ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू शकत नाही. मध काही काळानंतर स्फटिकरूप झाला, तर तुम्ही मधाचा सीलबंद कंटेनर किंवा जार ५-१० मिनिटे गरम पाण्यात ठेवू शकता. यामुळे मध मऊ होईल आणि त्याच्या सामान्य पोतावर परत येईल. तर, त्याची चव गोड आणि नेहमीसारखीच ताजी राहील.
संबंधित बातम्या