मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  On This Day: आजच्या दिवशी भारत-बांग्लादेशमध्ये झाला होता मैत्री करार, जाणून घ्या १९ मार्चचा इतिहास

On This Day: आजच्या दिवशी भारत-बांग्लादेशमध्ये झाला होता मैत्री करार, जाणून घ्या १९ मार्चचा इतिहास

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 19, 2023 10:51 AM IST

History of 19 March: १९ मार्चच्या इतिहासात देश आणि जगाशी संबंधित अनेक घटनांचा समावेश आहे.

१९ मार्चचा इतिहास
१९ मार्चचा इतिहास (freepik)

19 March Today Historical Events: भारत आणि बांगलादेशच्या इतिहासात १९ मार्च या तारखेला विशेष महत्त्व आहे. वास्तविक १९७२ साली आजच्या दिवशी या दोन देशांदरम्यान मैत्री आणि शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. याद्वारे दोन्ही देशांमध्ये परस्पर सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले होते. कला, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात परस्पर सहकार्याला चालना देण्याचे वचनही दोन्ही देशांनी एकमेकांना दिले. जाणून घ्या आजच्या दिवशी इतिहासातील काही खास घटना.

१९ मार्चशी संबंधित भारतीय इतिहास

१८८४ - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नारायण भास्कर खरे यांचा जन्म झाला.

१८९० - स्वामी दयानंद सरस्वती यांचे शिष्य आणि आर्य समाजाच्या पाच प्रमुख नेत्यांपैकी एक पंडित गुरु दत्त विद्यार्थी यांचे निधन झाले.

१९२० - यूएस सिनेटने व्हर्साय करार नाकारला.

१९३९ - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप यांचा जन्म झाला.

१९४४ - आझाद हिंद सेनेने ईशान्य भारतातील मुख्य भूभागावर राष्ट्रध्वज फडकवला. आझाद हिंद सेनेने जपानी लष्कराच्या मदतीने ईशान्य भारतामध्ये म्हणजे भारताच्या मुख्य भूमीवर पाऊल ठेवलं.

१९५३ - अकादमी पुरस्कार पहिल्यांदा टेलिव्हिजनवर दाखवण्यात आले.

१९५४ - भारतीय शिक्षणतज्ज्ञ इंदू शहानी यांचा जन्म झाला.

१९६५ - इंडोनेशियाने सर्व विदेशी तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले.

१९७२ - भारत आणि बांगलादेश यांच्यात मैत्री करार झाला.

१९७८ - प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक आणि माजी लोकसभा अध्यक्ष एम.ए. अय्यंगार यांचे निधन झाले.

१९८२ - महान राजकारणी जेबी कृपलानी यांचे अहमदाबाद येथे निधन झाले.

१९८४ - भारतीय अभिनेत्री तनुश्री दत्ताचा जन्म झाला.

१९९० - जगातील पहिल्या IIHF ने महिलांच्या आईस हॉकी स्पर्धेला मान्यता दिली.

१९११ - जैन साहित्यातील तज्ज्ञ आणि संशोधन लेखक अगरचंद नाहटा यांचा जन्म झाला.

१९९८ - अटलबिहारी वाजपेयी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले.

१९९८ - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ईएम एस नंबूदीरीपाद यांचे निधन झाले.

२००८ - डोनकुपर रॉय यांनी मेघालयचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

२००८ - पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी सरबजीतच्या फाशीला ३० एप्रिल २००८ पर्यंत स्थगिती दिली होती.

२००८ - भारतासह बहुतेक देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारावरील नवीन मसुदा नाकारला.

२०११ - भारतीय चित्रपट अभिनेते नवीन निश्चल यांचे निधन झाले.

२०१३ - महाराष्ट्रात बस अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला होता.

२०१५ - प्रसिद्ध भाषा विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ सूरजभान सिंग यांचे निधन झाले.

२०२० - कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गामुळे देशात चौथ्या मृत्यूची नोंद झाली.

(वरच्या लेखात काही निवडक घटना दिल्या आहेत. या खेरीज भारतीय इतिहासात आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या होत्या.)

WhatsApp channel

विभाग