Thoughts of Mahatma Gandhi in Marathi: महात्मा गांधी हे स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे. सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालत त्यांनी इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडले. काही जण त्यांना बापू म्हणतात तर काही जण त्यांना राष्ट्रपिता म्हणतात. दोघांचाही अर्थ एकच आहे, महात्मा गांधी प्रत्येक भारतीयाचे बापू म्हणून पाहिले जाते, ज्यांनी योग्य मार्गाचा अवलंब केला आणि स्वातंत्र्ययुद्ध लढले आणि या युद्धात भारतीयांना मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी, दुर्दैवाने ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. ३० जानेवारी हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून इतिहासात कायमचा नोंदवला गेला आहे. दरवर्षी ३० जानेवारी रोजी गांधीजींच्या पुण्यतिथीसोबतच शहीद दिनही साजरा केला जातो. आज या दिनानिमित्त गांधीजींचे काही क्रांतिकारक विचार जाणून घेऊया...
> कोणत्याही व्यक्तीचे विचार हेच सर्वस्व असतात.जो विचार करतो तो
तसा बनतो!
> सर्व धर्म एकच गोष्ट शिकवतात. त्यांचे दृष्टिकोन फक्त वेगळे आहेत!
> जर स्वातंत्र्यात चुका करण्याचे स्वातंत्र्य नसेल तर त्याला काही अर्थ नाही.
> तुम्ही किती सामर्थ्यवान आहात, हे फक्त तुमच्या शारीरिक शक्तीवरून दिसत नाही. तर एखादी गोष्ट करण्याची तुमची इच्छाशक्ती किती दुर्दम्य आहे, यातूनही ते दिसतं.
> सोनं, चांदी, पैसे ही सगळी भौतिक, वरवरची संपत्ती आहे. आपलं चांगलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आरोग्य चांगलं असेल तर सर्वकाही मिळवता येतं.
> आपण एखादी गोष्ट करतो, ती आपल्यासाठी नगण्य असू शकते. पण प्रत्येक कृतीमागे मोठा अर्थ दडलेला असतो. तुम्ही जे करता, त्याचे महत्व जाणलं पाहिजे.
> दुर्बल कधीही क्षमा करू शकत नाहीत. क्षमा करणे हे बलवानांचे लक्षण आहे.
>बापू सांगायचे की, तुमचे विचार नेहमी सकारात्मक ठेवा कारण तुमचे विचार तुमचे शब्द बनतात. तुमचे शब्द सकारात्मक ठेवा कारण तुमचे शब्द तुमचे वर्तन बनतात. तुमचे वर्तन सकारात्मक ठेवा कारण तुमचे वागणे तुमच्या सवयी बनते. तुमच्या सवयी सकारात्मक ठेवा कारण तुमच्या सवयी तुमचे मूल्य बनतात. तुमची मूल्ये सकारात्मक ठेवा कारण तुमची मूल्ये तुमचे भाग्य बनतात.
संबंधित बातम्या