Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
बंड्या आणि टोण्या बोलत असतात.
बंड्या - साखरपुडा आणि लग्नात इतकं अंतर का ठेवलं जातं?
टोण्या - माहीत नाही. का रे?
बंड्या - कारण उद्या कोणी बोलू नये की सुटकेची एकही संधी दिली नव्हती.
…
सगळं काही सुरळीत सुरू असताना एकदा बायकोनं नवऱ्याच्या कानफाटात मारली.
नवरा जागेवरच भिरभिरला आणि म्हणाला,
अगं पण माझी चूक काय?
बायको - तुम्ही चूक करेपर्यंत मी वाट बघत बसू का?
…
२०१० साली काही कैद्यांना जज्जसाहेबांनी शिक्षेचे दोन पर्याय दिले.
जन्मठेप किंवा मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईपर्यंत तुरुंगात राहणे...
जन्मठेप निवडलेले कैदी सुटले!
मुंबई गोवा महामार्ग होईपर्यंत शिक्षा स्वीकारलेल्या कैद्यांनी सुटकेची आशा सोडून दिली आहे.
संबंधित बातम्या