Chanakya Niti: आचार्य चाणक्य आजही त्यांच्या धोरणांमुळे प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती लिहली. त्यांनी नीती शास्त्रामध्ये अनेक पैलूंवर नजर टाकली आहे त्यांच्या धोरणांचा अवलंब केल्यास दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांपासून वाचू शकतो. चाणक्याची धोरणे यशासाठी रामबाण उपाय आहेत. चाणक्य नीती म्हणते की एक शक्तिशाली शत्रू आणि कमकुवत मित्र नेहमी दुःख देतात. यापासून सावध राहिले पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेऊयात..
> बुद्धिमान व्यक्तीने कधीही उपाशी राहू नये. भूक लागल्याने बुद्धीवर वाईट परिणाम होतो ज्यामुळे आपण चुकीची काम करू शकतो. यामुळे माणसाची प्रतिमा खराब होते.
> जिथे आदर नाही, जिथे कमाईची साधने नाहीत, जिथे ज्ञानाची साधने नाहीत. जिथे मित्र आणि नातेवाईक नाहीत तिथे राहून फायदा नाही. अशी जागा त्वरित सोडली पाहिजे.
> चाणक्य नीती म्हणते की ज्याप्रमाणे पक्षी दोन पंखांच्या मदतीने आकाशात उडतात, त्याचप्रमाणे मनुष्य कृती आणि ज्ञान या दोन पंखांच्या सहाय्याने यशाच्या आकाशातही उडू शकतो.
> चाणक्य म्हणतात की जर तुम्हाला आनंदी आणि यशस्वी व्हायचे असेल तर नेहमी खरे बोला. शहाणपणाने खर्च करा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. जे असे करतात त्यांना शांत येते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या