Mango Eating Tips: आंबा खाण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? जाणून घ्या आयुर्वेदानुसार कसे खावे हे फळ
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mango Eating Tips: आंबा खाण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? जाणून घ्या आयुर्वेदानुसार कसे खावे हे फळ

Mango Eating Tips: आंबा खाण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? जाणून घ्या आयुर्वेदानुसार कसे खावे हे फळ

Apr 13, 2024 12:44 PM IST

Ayurveda Tips: आंबा हे बहुतेक लोकांचे आवडते फळ असते. पण तुम्हाला ते खाण्याची योग्य पद्धत माहित आहे का? आयुर्वेदानुसार हे फळ कसे खावे ते जाणून घ्या.

Mango Eating Tips: आंबा खाण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? जाणून घ्या आयुर्वेदानुसार कसे खावे हे फळ
Mango Eating Tips: आंबा खाण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? जाणून घ्या आयुर्वेदानुसार कसे खावे हे फळ (unsplash)

Right Way to Eat Mangoes: उन्हाळ्यात लोक भरपूर आंबे खातात. आंबा हा अनेकांचा आवडला फळ असतो. पण काही लोकांची तक्रार असते की हे फळ खाल्ल्यानंतर त्यांना पोटदुखी होते किंवा त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स दिसतात. आंबा खाल्ल्यानंतर तुम्हाला अशी समस्या येत असेल तर समजून घ्या की तुम्ही तो चुकीच्या पद्धतीने खात आहात. आयुर्वेदिक तज्ञ दीक्षा भावसार यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे आंबा खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. चला तर आंबा खाण्याआधी ते खाण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया

कसा खावा आंबा?

आंबा खाण्यापूर्वी तो किमान १-२ तास भिजत ठेवावा. जर तुम्हाला घाई असेल तर त्यांना २५-३० मिनिटे पाण्यात भिजवणे देखील चांगले आहे.

का भिजवावा आंबा?

तज्ज्ञांच्या मते तुम्ही आंबा पाण्यात नक्कीच भिजवला पाहिजे. वास्तविक असे केल्याने त्यातील अतिरिक्त फायटिक अॅसिड निघून जाते. आंबा काही तास पाण्यात भिजवून ठेवल्यास पोषक द्रव्ये चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत होते. भिजवल्याने मुरुम, त्वचेच्या समस्या, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आणि इतर आतड्यांसंबंधी समस्या टाळण्यास मदत होते.

फायटिक अॅसिड म्हणजे काय?

फायटिक अॅसिड एक अँटी पोषक तत्त्व आहे, जे शरीराला काही खनिजे जसे की लोह, जस्त, कॅल्शियम आणि इतर खनिजे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते. ज्यामुळे खनिजांची कमतरता निर्माण होते. अतिरिक्त फायटिक अॅसिड शरीरात उष्णता निर्माण करते.

आयुर्वेदानुसार आमरस खाणे योग्य आहे का?

फळ म्हणून आंबा खाणे चांगले असते. तर आयुर्वेद दूध आणि फळे वेगवेगळे खाण्याचा सल्ला देतो. कारण त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. आंबा, एवोकॅडो, खजूर इत्यादी शुद्ध गोड आणि पिकलेल्या फळांमध्येच दूध मिसळता येते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुधासोबत पिकलेला आंबा वात आणि पित्ताला शांत करतो. चवदार, पौष्टिक, शक्तिवर्धक, कामोत्तेजक आणि रंग सुधारतो. त्याची प्रकृती गोड आणि थंड असते. तुम्ही मँगो शेकचा आस्वाद घेऊ शकता, असे तज्ज्ञ सांगतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner