Heatwave Asthama: उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उद्भवू शकते दम्याची समस्या! ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Heatwave Asthama: उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उद्भवू शकते दम्याची समस्या! ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी

Heatwave Asthama: उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उद्भवू शकते दम्याची समस्या! ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी

Published Jun 02, 2024 08:51 AM IST

उष्णतेच्या लाटेमुळे दम्याची शक्यता वाढली आहे. भारतातील प्रमुख शहरांमध्ये तापमानात वाढ आणि तीव्र उष्णतेची स्थिती लक्षात घेता, स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.

उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उद्भवू शकते दम्याची समस्या!
उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उद्भवू शकते दम्याची समस्या! (Photo by Raj K Raj/ Hindustan Times)

जागतिक स्तरावर, दमा हा सर्वात प्रचलित तीव्र आजारांपैकी एक आहे, ज्यामुळे जगभरातील ३०० दशलक्ष लोक प्रभावित झालेले आहेत. तर, २०२५पर्यंत ही संख्या १०० दशलक्षांनी वाढण्याची शक्यता आहे. बाहेरील प्रदूषण, विषाणू, परागकण आणि इतर पर्यावरणीय घटकांसारख्या ट्रिगरच्या संपर्कात येण्यामुळे दमा आणि दम्याशी संबंधित नवीन आजारांचा धोका वाढतो.

विशेष म्हणजे, पर्यावरणीय प्रदूषकांव्यतिरिक्त, अभ्यासात अत्यधिक तापमान आणि एलर्जीक दमा यांच्यात मजबूत संबंध आढळला आहे. अभ्यासात असे आढळले आहे की अत्यधिक उष्णतेमुळे दम्यावर लक्षणीय परिणाम होतो आणि उष्णतेची ही तीव्र लाट अस्थम्यात एक महत्त्वपूर्ण ट्रिगर म्हणून काम करू शकते.

अतिउष्णता आणि दमा : संबंध समजून घ्या!

पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलचे कन्सल्टंट अॅलर्जिस्ट डॉ. विजय वराड यांनी एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘अतिउष्णतेमुळे शरीरात द्रव कमी होतो, ज्याचा परिणाम फुफ्फुसांसह शरीरातील रक्ताभिसरणावर होतो. उष्णतेमुळे फुफ्फुसाच्या कार्यावर परिणाम होत असल्याने दम्याच्या रुग्णांना अटॅक आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. शिवाय, तीव्र उष्णता आणि दमट हवामानामुळे हवेतील प्रदूषक, कीटक आणि सामान्य एलर्जीनची पातळी वाढू शकते. ज्यामुळे दम्याचा झटका येण्याची धोका वाढू शकतो. वातावरणातील कार्बन-डायऑक्साईडचे प्रमाण आणि उष्ण तापमानामुळे परागकणांचे उत्पादन वाढवते, विशेषत: शहरी भागात याचे प्रमाण जास्त आहे.’

Anxiety Attack: रात्रीची झोप खराब करू शकते एंग्जायटीची समस्या, या मार्गांनी करा स्वतःला शांत

ते म्हणाले की, ‘हवेतील हे कण संवेदनशील वायुमार्गाला त्रास देऊ शकतात आणि एलर्जिक दम्याला कारणीभूत ठरू शकतात. भविष्यात उष्णतेची लाट वाढेल आणि एलर्जिक दम्याच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जसजसे तापमान वाढते, तसतसे धुळीचे कणही एलर्जेनची शक्ती वाढण्याबरोबर वाढतात. ग्लोबल वॉर्मिंगमुळे परागकणांचा हंगाम सध्या लांबला आहे. हिवाळ्यात पुन्हा धुक्यामुळे हवेतील हे परागकण खाली अडकतात, त्याबरोबरच वाहनांचा धूर, धूळ आणि बांधकामाची धूळ या समस्या देखील आहेत. ग्रामीण भागाबद्दल बोलायचे झाले, तर कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे या परागकणांची शक्ती वाढली आहे.’

Jaljeera Recipe: केवळ उष्माघातापासून बचाव नाही तर वेट लॉस साठी फायदेशीर आहे जलजीरा, पाहा रेसिपी

अशा तीव्र उष्णतेच्या परिस्थितीत डॉ. विजय वराड यांनी काही उपाय सुचवले आहेत, ज्यामुळे तुम्ही स्वतःचा बचाव करू शकाल…

  • हायड्रेटेड रहा: शरीरातील द्रव कमी होण्यापासून वाचण्यासाठी, हायड्रेटेड राहणे आणि रक्ताभिसरण ठेवणे गरजेचे आहे. यामुळे फुफ्फुसाचे कार्य संतुलित राहील. यासाठी पाणी आणि इतर द्रव पदार्थ पीत राहावे.
  • बाहेरील प्रदूषण टाळण्यासाठी शक्य तितक्या वेळ घरातच रहा: शक्यतो घरातच राहण्याचा प्रयत्न करा. गरज भासल्यास बाहेर फिरताना योग्य ती खबरदारी घ्या आणि हवामानाची परिस्थिती बिकट असताना सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत बाहेर पडणे टाळा.
  • घरात असल्यास प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी खिडक्या बंद ठेवा : केवळ बाहेरील प्रदूषणामुळे दम्याचा परिणाम होतो असे नाही. घरात राहिल्यास खिडक्या बंद ठेवणे हा देखील एक पर्याय आहे. एअर ह्युमिडिफायर आणि एअर कंडिशनर वापरणे यासारख्या योग्य पद्धती वापरतानाही खबरदारी घ्या.
  • दम्याच्या लक्षणांवर लक्ष ठेवा : खबरदारी व्यतिरिक्त दम लागणे, छातीत घट्टपणा, अनुनासिक मार्गात जळजळ इ. दम्याची लक्षणे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
  • योग्य धूळ आणि फिल्टर मास्क वापरावा. एक्सपोजर टाळण्यासाठी कारमधून प्रवास करतानाही कार एअर कंडिशनरमध्ये ही पोलेन फिल्टर असणे आवश्यक आहे.
  • हवामानाचा अंदाज, वातावरणातील हंगामी बदल आणि एरोएलर्जेनच्या पातळीची माहिती जाणून घ्या आणि त्यानुसार आपल्या वेळापत्रकाचे नियोजन करा: शहराच्या हवामानाच्या अंदाजाची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्यानुसार आपल्या वेळापत्रकाचे नियोजन करणे आवश्यक आहे. भविष्यात होणारा त्रास टाळण्यासाठी आधीच उष्णतेच्या अलर्टचे दिवस आणि ऑरेंज/ रेड अलर्टचे दिवस बाहेर जाणे टाळा.

योग्य ती खबरदारी घेऊन एखादी व्यक्ती त्यांच्या एलर्जीचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकते आणि एलर्जीच्या दम्यास कारणीभूत ठरणारे ट्रिगर रोखू शकते. उष्णतेची लाट आणि तीव्र परिस्थितीमुळे एलर्जिक दम्याची शक्यता वाढते. कोणतीही लक्षणे कायम राहिल्यास आपल्या डॉक्टरांशी बोलणे आणि योग्य उपचार घेणे महत्वाचे आहे.

Whats_app_banner