Health Tips: गोड खाण्याची सर्वात चांगली आणि वाईट वेळ कोणती? तुम्हाला माहीत आहे का?
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: गोड खाण्याची सर्वात चांगली आणि वाईट वेळ कोणती? तुम्हाला माहीत आहे का?

Health Tips: गोड खाण्याची सर्वात चांगली आणि वाईट वेळ कोणती? तुम्हाला माहीत आहे का?

Published Sep 15, 2024 01:19 PM IST

Sweets Eating Tips: तसं तर गोड कमी असो वा जास्त ते शरीराचे नुकसान करते. पण योग्य वेळी खाल्ल्यास त्याचे नुकसान टाळता येतात. जाणून घ्या मिठाई खाण्याची सर्वोत्तम आणि वाईट वेळ कोणती आहे.

health tips - गोड खाण्याची चांगली आणि वाईट वेळ
health tips - गोड खाण्याची चांगली आणि वाईट वेळ (unsplash)

Best and Worst Time to Eat Sweets: गोड पदार्थ खायला आवडणाऱ्या लोकांची कमतरता नाही. बहुतेक लोकांना जेवण केल्यानंतर गोड पदार्थ किंवा मिठाई खायची क्रेविंग असते. काही लोक प्रत्येक जेवणानंतर २ ते ४ मिठाई खातात. पण मिठाई खाण्याची ही योग्य पद्धत आहे का? नाही. गोड पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहे. विशेषत: जर ते चुकीच्या वेळी खाल्ले गेले असेल.

जर तुम्हाला गोड पदार्थ खायला आवडत असतील तर तुम्हाला मिठाई खाण्याची योग्य वेळ माहित असायला हवी. त्याच बरोबर कोणत्या वेळी मिठाई खाल्ल्याने सर्वाधिक नुकसान होईल, हे सुद्धा जाणून घ्या. अनेक वेळा आरोग्यासाठी हानिकारक असूनही जर ते योग्य वेळी खाल्ले तर ते आरोग्यासाठी घातक ठरत नाही. चला तर मग नुकसान टाळण्यासाठी गोड पदार्थ खाण्याची सर्वात चांगली आणि सर्वात वाईट वेळ कोणती आहे ते पाहूया.

मिठाई खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?

आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की मिठाई खाण्याची सर्वोत्तम वेळ व्यायामाच्या ३० मिनिटे आधी आहे. असे मानले जाते की वर्कआउट करण्यापूर्वी मिठाई खाल्ल्यास आपण त्वरित कॅलरी बर्न करू शकता. तुम्ही मिठाई सकाळच्या वेळी देखील खाऊ शकता. हा काळ मिठाई खाण्यासाठी चांगला आहे, कारण दिवसा इतर वेळी मिठाई खाण्याच्या तुलनेत या वेळी खाल्ल्याने रक्तातील साखर थोडी वाढते.

मिठाई खाण्याची सर्वात वाईट वेळ कोणती?

मिठाई खाण्याची दिवसाची सर्वात वाईट वेळ म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर रात्री उशीरा खाणे आहे. विशेषत: झोपण्यापूर्वी हे खाल्ल्याने समस्या वाढू शकते. कारण या वेळी गोड खाल्ल्याने तुम्हाला अतिरिक्त कॅलरी बर्न करायला वेळ मिळणार नाही, ज्यामुळे चरबी जमा होऊ शकते.

खूप जास्त मिठाईमुळे उद्भवू शकतात समस्या

जास्त गोड खाल्ल्याने लोकांमध्ये जास्त कॅलरी असू शकतात. ज्यामुळे वजन वाढू शकते. जास्त वजनामुळे हृदयाच्या समस्या, काही कर्करोग आणि टाइप २ मधुमेह यासारख्या आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner