Chanakya Niti in Marathi: प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात सुख, समृद्धी हवी असते. फक्त यशच नाही तर आर्थिक बाबतीतही व्यक्तीला स्थैर्य हवे असते. कोणालाही आयुष्यात गरिबीचा सामना करावा लागू नये असे वाटते. प्रत्येकाला आपण श्रीमंत असावे असे वाटते. पण अनेक वेळा प्रयत्न करूनही तसं होत नाही. यासाठी तुम्हाला चाणक्य नीती मदत करेल. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात सांगितलेली अनेक धोरणं फॉलो केली तर आपण अशा परिस्थितीत अडकण्यापासून वाचू शकतो. आर्थिक चणचण पासून वाचण्यासाठी आचार्य चाणक्य यांची कोणती धोरणे फॉलो करावी ते जणून घ्या.
ज्या घरात अशांततेचे किंवा घाणीचे वातावरण असते, तिथे लक्ष्मी कधीच वास करत नाही. अशा परिस्थितीत लोकांनी या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. आपल्या घरात शांतता आणि स्वच्छता राखली पाहिजे.
जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा अनेक वेळा पैसे उपयोगी पडतात. अशा स्थितीत व्यक्तीने कधीही अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च करू नये. कारण निरुपयोगी गोष्टींवर पैसे खर्च करणाऱ्या व्यक्तीला भविष्यात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे काटकसरीने वापर केला पाहिजे.
आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या व्यक्तीला नेहमी बचत करण्याची सवय असते, अशा व्यक्तीला कधीही गरिबीचा सामना करावा लागत नाही. आपल्या कमाईतील काही भाग भविष्यासाठी नेहमी साठवून ठेवला पाहिजे. हीच साठवणूक भविष्यात अडचणीच्या वेळी उपयोगात येते.
व्यक्ती कंजूष असते तेव्हा तिला नेहमी पैशाची चिंता करावी लागते. अशा परिस्थितीत माणसाने कंजूषी टाळली पाहिजे. अन्यथा भविष्यात त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. काटकसर करणे आणि कंजूषी यातील फरक ओळखून कंजूषी करू नये.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या