Smartphone Disadvantages: मोबाईल फोन हा मानवी जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे. त्यामुळे अनेकदा लोक दिवसभर स्क्रोल करणे, ईमेल तपासणे, सोशल मीडिया अपडेट्ससह व्हिडिओ पाहताना दिसतात. असे अनेक लोक आहेत, जे एका वेळेज जेवणाचा डबा विसरतील. पण आपला फोन सोबत नेण्यास विसरणार नाही. तज्ज्ञांचे मते, फोनचा अतिवापर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. त्यामुळे शक्य तितका फोनचा वापर करणे टाळावे.
फोनच्या अतिवापरामुळे डोळ्यावर ताण येऊ शकतो. अगदी लहान वयातच डोकेदुखीसारखा त्रास होऊ शकतो. फोनच्या अतिवापराची लक्षणे म्हणजे मायग्रेन, डोकेदुखी, चक्कर येणे, डोळ्यांवर ताण येणे, मानदुखी आदीचा समावेश आहे. दीड तासांपेक्षा अधिक वेळ फोनमध्ये पाहणे अनेकदा घातक ठरू शकते. त्यामुळे फोनचा अतिवापर टाळला पाहजे.
तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना डोकेदुखीचा त्रास जास्त आहे. त्यांनी दुर्लक्ष न करता न्यूरोलॉजिस्टकडून तपासून घ्यावे. त्यामुळे आपल्याला पटकन आराम मिळू शकतो. अशा आजारांकडे दुर्लक्ष करणे अनेकांना महागात पडले आहे. त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.
संबंधित बातम्या