Chankya Niti: स्त्रियांमधील 'हे' गुण ठरतात वरदान; अशा महिलांशी लग्न केल्यास घराचं होतं गोकुळ! चाणक्य म्हणतात...
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chankya Niti: स्त्रियांमधील 'हे' गुण ठरतात वरदान; अशा महिलांशी लग्न केल्यास घराचं होतं गोकुळ! चाणक्य म्हणतात...

Chankya Niti: स्त्रियांमधील 'हे' गुण ठरतात वरदान; अशा महिलांशी लग्न केल्यास घराचं होतं गोकुळ! चाणक्य म्हणतात...

Dec 07, 2024 08:43 AM IST

Chankya Niti In Marathi : स्त्रियांमधील काही गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या कल्याणासाठीही खूप महत्त्वाचे असतात. आचार्य चाणक्य यांनी अशाच काही गुणांबद्दल सांगितले आहे, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

What is Chanakya Niti
What is Chanakya Niti (freepik)

Aacharya Chankya Thoughts In Marathi : चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या आपले जीवन सुधारण्याचे काम करतात आणि आपल्याला योग्य दिशा दाखवतात. यासोबतच आचार्य चाणक्य यांनी स्त्री-पुरुषांच्या गुण-दोषांचीही माहिती दिली आहे. आज आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्य यांनी स्त्रीचे कोणते गुण विशेष मानले आहेत हे सांगणार आहोत. हे गुण स्त्रीमध्ये असण्याने घर स्वर्गासारखे बनते. जो पुरुष अशा स्त्रियांशी विवाह करतो तो आपल्या आयुष्यात नेहमी सुखी आणि समृद्ध राहतो. महिलांच्या या गुणांबद्दल जाणून घेऊया.

पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा गुण

आचार्य चाणक्य यांच्या मते, स्त्रीच्या जीवनात काही ध्येय असले पाहिजे. ज्या स्त्रिया ध्येयहीन असतात त्यांचा वेळ निरुपयोगी गोष्टींमध्ये वाया जातो, याचा वाईट परिणाम त्यांच्या कुटुंबावर होतो. तर, ज्या स्त्रिया जीवनात ध्येय घेऊन पुढे जातात त्या अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत नाहीत. अशा महिला स्पष्ट विचार करतात आणि त्यांचे कुटुंब व्यवस्थित ठेवतात. लग्नानंतर अशा महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालतात. त्यामुळे महिलांमध्ये हा गुण असला पाहिजे.

कठीण प्रसंगात साथ देणारी

प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी वाईट वेळ येते. अनेकदा वाईट काळात तुमची जवळची माणसंही तुमच्यापासून दूर जातात. अशा वेळी प्रत्येक प्रसंगात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी स्त्री तुम्हाला मिळाली तर यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. म्हणूनच, आचार्य चाणक्य यांच्या मते, जी आपल्या जीवनसाथीला कठीण प्रसंगातही साथ देते, जी स्त्री तुम्हाला कठीण प्रसंगातही प्रेरणक देते, ती खूप चांगली जोडीदार असते. असा जोडीदार कोणाला मिळाला तर, तो पृथ्वीवर स्वर्गसुख अनुभवू शकतो.

Chanakya Niti: 'हे' ५ काम करणारे लोक होतात गरीब, वाचा यांच्याजवळ का राहात नाही लक्ष्मी

दिसण्यावर नाही मनावर प्रेम करा!

ज्या स्त्रिया आपल्या जोडीदाराच्या दिसण्याकडे लक्ष देत नाहीत, तर त्यांच्या गुणांकडे लक्ष देतात त्यांचे कौटुंबिक जीवन देखील आनंदी आणि समृद्ध असते. वयानुसार तुमचे रूप बदलले तरी तुमचे गुण नेहमीच तुमच्यासोबत राहतात, त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या मते, तुम्ही अशा स्त्रीशीच संबंध प्रस्थापित करा, जी तुमच्या दिसण्यावर किंवा पैशावर नाही तर तुमच्या गुणांकडे लक्ष देते. अशी स्त्री तुमची साथ कधीच सोडत नाही.

जोडीदारचा अभिमान असणारी

जर, एखाद्या स्त्रीला तिच्या जोडीदाराच्या कर्तृत्वाचा अभिमान असेल आणि त्याच्या जोडीदाराच्या उणिवा दाखवून त्यावर मात करण्यासाठी त्याला प्रवृत्त करत असेल, तर समजून घ्या की ती खरी जीवनसाथी आहे. अशा महिलांनी एखाद्या चुकीच्या व्यक्तीसोबत नातेसंबंध जोडले तरीही त्या त्यांना योग्य मार्गावर आणू शकतात. हे गुण असलेल्या स्त्रीशी विवाह केल्याने पुरुषाचे कुटुंब सुखाने व शांततेने जगते.

Whats_app_banner