Acharya Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या हयातीत अनेक प्रकारची धोरणे रचली होती. या धोरणांमध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा खुलेपणाने उल्लेख केला आहे. आणि या धोरणांमध्ये त्यांनी काही गोष्टींबद्दलही सांगितले आहे, ज्या व्यक्तीने जीवनात यश मिळवण्यासाठी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या माणसांच्या अशा काही वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत ज्यांमुळे त्यांच्याकडे करोडो किंवा अब्जावधींची संपत्ती असली तरी त्यांच्याकडे पैसा टिकट नाही. इतकंच नव्हे तर अशा लोकांना आयुष्यात नेहमी गरिबीसोबतच जगावे लागते.
चाणक्य नीतीनुसार, जर तुम्हाला मेहनत करण्याची भीती वाटत असेल, तर ती खूप वाईट सवय आहे. जे लोक आयुष्यात कष्ट करायला घाबरतात त्यांना कधीच यश मिळत नाही. असं म्हणतात की, जर तुम्हाला आयुष्यात यश मिळवायचं असेल आणि श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही मेहनत करायला घाबरू नका.
चाणक्य नीतीनुसार, जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर तुम्ही तुमचे ध्येय नेहमी इतरांपासून लपवून ठेवावे. जर तुम्ही तुमचे ध्येय प्रत्येकाला सांगत राहिलात तर तुम्ही कधीच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमची ध्येये आयुष्यात साध्य करता तोपर्यंत कोणाशीही शेअर करू नका.
आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीचा अभिमान बाळगू नये. आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर अभिमान वाटणारे अनेक लोक असतात. चाणक्य नीतीमध्ये याचे वर्णन चुकीचे असे केले आहे. जर तुम्हाला जीवनात नेहमी यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्ही लवकरात लवकर गर्व सोडला पाहिजे. गर्विष्ठ माणसांकडे कधीच यश आणि संपत्ती टिकत नाही.
चाणक्य नीतीनुसार, जर तुम्ही विचार न करता अनावश्यकपणे पैसे खर्च केले तर ते तुमच्या विनाशाचे मुख्य कारण बनू शकते. जेव्हा तुम्ही विचार न करता पैसे खर्च करता तेव्हा देवी लक्ष्मी तुमच्यासोबत कधीच राहत नाही. इतकंच नव्हे तर कंजूषपणाची सवय असेल, तर ती तुमच्या विनाशाचे कारणही बनू शकते.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जो सकाळी उशिरापर्यंत झोपतो तो समाजातील इतर सर्वांपेक्षा मागे राहतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला यश मिळवायचे असेल आणि श्रीमंत व्हायचे असेल, तर तुम्ही तुमचा आळस सोडून सकाळी लवकर उठण्याची आणि रात्री लवकर झोपण्याची सवय लावली पाहिजे.
संबंधित बातम्या