Chanakya Niti to Choose Partner: लग्न हे दोन आयुष्यांचे संगम असते. हे नाते मजबूत आणि टिकाऊ राहावे यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. भारतीय इतिहासातल्या महान तत्त्वज्ञानी चाणक्य यांनी वैवाहिक जीवनाबद्दल अनेक मूल्यवान सूचना दिल्या आहेत. त्यांनी नीती शास्त्रात जोडीदार निवडण्याबद्दल सांगितले आगे. लग्न करण्यापूर्वी आपल्या भावी जोडीदाराबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया चाणक्य नीतीनुसार लग्नापूर्वी किंवा आयुष्यभराचा साथीदार निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे.
चाणक्य म्हणतात की, पती-पत्नींचे वय जवळपास सारखे असणे आवश्यक आहे. वयातील फरक जास्त असेल तर दोघांमध्ये विचारांची आणि जीवनशैलीची असंगती निर्माण होऊ शकते. यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.
एक निरोगी नाते तयार करण्यासाठी दोन्ही जोडीदारांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले असणे आवश्यक आहे. कोणतीही शारीरिक किंवा मानसिक समस्या नात्यावर परिणाम करू शकते.
आपल्या भावी जोडीदाराचे चरित्र आणि स्वभाव जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांचे मूल्य, विश्वास आणि जीवन जगण्याची पद्धत आपल्याशी जुळते का हे पहावे.
जोडीदाराच्या कुटुंबाबद्दल माहिती घेणे देखील महत्त्वाचे आहे. कुटुंबाचे वातावरण, त्यांचे मूल्य आणि परंपरा यांचा आपल्या जीवनावर काही प्रमाणात प्रभाव पडू शकतो.
लग्न हे दोन कुटुंबांचे एकत्रीकरण असते. त्यामुळे दोघांचीही आर्थिक स्थिती समजून घेणे आवश्यक आहे.
लग्नानंतरचे जीवन कसे जगायचे याबद्दल दोघांचेही स्पष्ट दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. आपल्या करिअर, कुटुंब आणि जीवनाच्या इतर पैलूंबद्दल एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या