Chanakya Niti : कधीही 'या' तीन लोकांना मदत करु नये, काय सांगतात आचार्य चाणक्य वाचा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti : कधीही 'या' तीन लोकांना मदत करु नये, काय सांगतात आचार्य चाणक्य वाचा

Chanakya Niti : कधीही 'या' तीन लोकांना मदत करु नये, काय सांगतात आचार्य चाणक्य वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 15, 2024 05:30 AM IST

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे. नेहमी सर्वांची मदत करावी असे आवाहान चाणक्य करत असतात. पण या तीन लोकांना कधीही मदत करु नये असा संदेशही चाणक्य देतात. आता ही तीन माणसे कोण? चला जाणून घेऊया...

Chanakya Niti
Chanakya Niti

Chanakya Niti : भारतातील महान व्यक्तींपैकी एक म्हणून आचार्य चाणक्य यांचे नाव घेतले जाते. त्यांनी आयुष्यात नैतिकतेचे धोरण पाळून नीती तयार केल्या आहेत. या नीतीमध्ये त्यांनी मानवाला सुखी राहण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी काय करावे आणि काय करु नये याविषयी सांगितले आहे. इतरांना नेहमी मदत करावी, असेही त्यांनी सांगितले आहे. पण त्यामध्येही चाणक्य यांनी तीन लोकांना चुकूनही मदत करू नये, असे सल्ला दिला आहे.

आपण अनेकदा चांगल्या किंवा वाईट गोष्टींचा जराही विचार न करता कुणालाही मदत करतो. पण याच चांगुलपणाचा कधी कधी पश्चाताप देखील होतो. त्यामुळे चाणक्य यांनी तीन लोकांना चुकूनही मदत करु नका असा सल्ला दिला आहे. आत या तीन व्यक्ती कोणत्या चला जाणून घेऊया...

व्यसन करणाऱ्या लोकांना मदत करु नये

चाणक्य सांगतात की व्यसन करणाऱ्या लोकांची चुकूनही मदत करू नये. जे लोक व्यसन करतात त्यांनी कधी तुमच्याकडे मदत मागतील तर त्यांना थेट नाही म्हणा. कारण असे लोकं व्यसनाच्या नादात सर्वकाही विसरतात आणि यांना पैशांची सुद्धा किंमत नसते. अशा माणसांना मदत करणे कधीही चांगले नसते. नशेत असताना हे लोकं कुणालाही नुकसान पोहचवू शकतात. चाणक्य यांच्या मते, या लोकांना चांगले वाईट याच्यातील फरकही कळत नाही. त्यामुळे अशा लोकांची मदत करू नये.

व्यक्तिमत्त्व चांगले नाही त्यांच्यापासून दूर राहणे

चाणक्य यांनी त्यांच्या धोरणांमध्ये सांगितले आहे की ज्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व चांगले नाही त्यांच्यापासून नेहमी दूर रहा. अशा लोकांना कधीही कोणत्याही प्रकारची मदत करु नका. ज्या लोकांचे व्यक्तिमत्त्व चांगले नाही, अशा लोकांची मदत केल्यामुळे तुम्ही सुद्धा अडचणीत येऊ शकता.त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणे नेहमीच योग्य ठरते.
वाचा : शत्रूंपेक्षाही जास्त धोकादायक असतात ‘अशी’ लोकं, लांब राहिलेलच बरं! चाणक्य नीती

असमाधानी लोकांना मदत करणे टाळा

जे लोक जीवनात समाधानी नसतात ते नेहमीच दु:खी असतात असे चाणक्य म्हणतात. अशा लोकांना मदत केल्यामुळे आपल्याला देखील दु:ख झाल्याची भावना येते. आपणही हळूहळू दु:खी राहू लागतो. जीवनात समाधानी नसणाऱ्या लोकांचे आयुष्य कितीही चांगले असो ते नेहमी दु:खी राहतात. त्यांना इतरांचे सुख बघवत नाही. अशा लोकांपासून दूर राहणे, कधीही चांगले आहे.

Whats_app_banner