Chanakya Niti: या' ठिकाणी कधीच घर बांधू नका किंवा खरेदी करू नका, आचार्य चाणक्यांनी सांगितलंय मोठं कारण
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: या' ठिकाणी कधीच घर बांधू नका किंवा खरेदी करू नका, आचार्य चाणक्यांनी सांगितलंय मोठं कारण

Chanakya Niti: या' ठिकाणी कधीच घर बांधू नका किंवा खरेदी करू नका, आचार्य चाणक्यांनी सांगितलंय मोठं कारण

Published Sep 10, 2024 08:10 AM IST

Thoughts of Acharya Chanakya: असं म्हटलं जातं की, ज्या व्यक्तीने आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन केले, तर त्याला सुखी आणि समृद्ध जीवनाचा लाभ मिळतो.

Chanakya Niti
Chanakya Niti

Chanakya Niti In Marathi:  असे फारच कमी लोक असतील ज्यांना आचार्य चाणक्याबद्दल माहिती नसेल. आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील महान विद्वान म्हणून ओळखले जात होते. चाणक्याने आपल्या हयातीत अनेक धोरणे तयार केली जी मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले जाते.असं म्हटलं जातं की, ज्या व्यक्तीने आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन केले, तर त्याला सुखी आणि समृद्ध जीवनाचा लाभ मिळतो. आचार्य चाणक्य यांनीही आपल्या धोरणांमध्ये व्यक्तीने काय करावे आणि काय करू नये यासंबंधी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

आज आम्ही तुम्हाला चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे व्यक्तीने कधीही घर बांधू नये किंवा खरेदी करू नये. असं म्हटलं जातं की, जर तुम्ही या ठिकाणी घर खरेदी केलं तर ते तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी समस्या निर्माण करू शकते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये घर खरेदी करण्याबाबत काय सांगितलं आहे ते आपण जाणून घेउया.

जिथे कायद्याचा धाक नाही-

आचार्य चाणक्य यांच्या मते, तुम्ही अशा ठिकाणी कधीही घर खरेदी करू नये, जिथे लोकांना कायद्याचा किंवा सार्वजनिक लाजेचा भीती वाटत नाही. अशा ठिकाणी घर बांधल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

जिथे वाईट लोक राहतात-

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, दुष्ट किंवा वाईट लोक राहत असलेल्या ठिकाणी कधीही घर खरेदी करू नये. अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा कधीही त्रास होऊ शकतो. त्यामुळे घर खरेदी करताना किंवा बांधताना नेहमी त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांचा विचार करूनच निर्णय घ्यावा.

जिथे रोजगाराचे कोणतेही साधन नाही-

चाणक्य नीतीनुसार, तुम्ही अशा ठिकाणी कधीही घर खरेदी करू नये जिथे रोजगाराचे चांगले साधन उपलब्ध नाही. अशा ठिकाणी घर विकत घेतल्यास ना नोकरी मिळेल ना व्यवसायाची संधी. अशा ठिकाणी घर विकत घेतल्यास आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. अशा ठिकाणी तुमची प्रगती तर होणारच नाही उलट तुम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल.

Whats_app_banner