Chanakya Niti: अशा स्त्रीशी विवाह केल्याने पुरुषाचे जीवन होते सुखी, उजळते भाग्य आणि होते भरभराट
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: अशा स्त्रीशी विवाह केल्याने पुरुषाचे जीवन होते सुखी, उजळते भाग्य आणि होते भरभराट

Chanakya Niti: अशा स्त्रीशी विवाह केल्याने पुरुषाचे जीवन होते सुखी, उजळते भाग्य आणि होते भरभराट

Jul 12, 2024 05:23 AM IST

Acharya Chanakya: चंद्रगुप्त मौर्यला राजा बनविण्यात आचार्य चाणक्य यांचे मोठे योगदान होते. आजच्या काळातही आचार्य चाणक्य यांची धोरणे प्रभावी ठरतात.

चाणक्य नीती
चाणक्य नीती

Chanakya Niti About Marriage: आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचे पालन करणारी व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी होऊ शकत नाही. आचार्य चाणक्य एक महान ज्ञानी व्यक्ती होते. चंद्रगुप्त मौर्यला राजा बनवण्यात आचार्य चाणक्य यांचे मोठे योगदान होते. आजच्या काळातही आचार्य चाणक्य यांची धोरणे प्रभावी ठरतात. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात खरा आणि समजूतदार जोडीदार हवा असतो. प्रत्येकाच्या आपल्या जोडीदाराकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. अनेकदा आयुष्याची अपेक्षा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीचा हात लोक धरतात. चाणक्य यांनी नीती शास्त्रात सांगितले आहे की, कोणत्या स्त्रीशी विवाह केल्यास पुरुषाचे जीवन सुखी होते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या स्त्रीमध्ये हे गुण असतात, त्यांच्याशी विवाह करणाऱ्या व्यक्तीचे झोपलेले भाग्यही जागृत होते. ज्या घरात अशी स्त्री जाते, तिथे फक्त नफा मिळतो. जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांनी स्त्रीचे कोणते गुण सांगितले आहेत.

पार्टनरची काळजी घेणारी स्त्री

चाणक्य नीतीनुसार जी स्त्री आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करते आणि नेहमी आपल्या जोडीदाराची काळजी घेते, अशा स्त्रीची साथ मध्येच सोडू नये. चाणक्य म्हणतात की, अशा स्त्रीसोबत वाद झाले तरी त्याचा समेट व्हायला हवा. कारण अशी स्त्री चांगल्या-वाईट दिवसात आपल्या जोडीदारासोबत राहते.

तुमच्या मनाच्या सौंदर्याला महत्त्व देणारी स्त्री

चाणक्य म्हणतात की, आपल्या मनाच्या सौंदर्याला महत्त्व देणाऱ्या स्त्रीशी लग्न करावे. काळाच्या ओघात बाह्य सौंदर्य विरून जाते. पण स्वभाव आयुष्यभर तसाच राहतो. स्वभावाला महत्त्व देणारी स्त्री आयुष्यभर तुमची सोबत करते.

शांत राहणारी स्त्री

आचार्य चाणक्य यांच्यानुसार जी स्त्री शांत राहते, जी रागावत नाही, तिच्याशी विवाह केल्याने व्यक्तीचे नशीब बदलते. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. सतत राग राग करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

घरातल्या मोठ्यांचा आदर आणि लहानांवर प्रेम करणारी स्त्री

आचार्य चाणक्य यांच्या मते अशी स्त्री जी घरातील मोठ्यांचा आदर करते आणि लहान मुलांवर प्रेम करते, तिच्याशी विवाह करणे भाग्यवान ठरते.

संयमी स्त्री

आचार्य चाणक्य यांच्या मते संयमी स्त्री कोणत्याही परिस्थितीत आपल्या जोडीदाराला सोडत नाही. अशा महिलेशी लग्न केल्याने व्यक्तीचे नशीब बदलते.

धार्मिक स्त्री

आचार्य चाणक्य यांच्यानुसार धार्मिक असलेल्या महिलेशी लग्न केल्याने व्यक्तीचे झोपलेले भाग्यही जागृत होते. धार्मिक व्यक्ती कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ शकत नाही. धर्माच्या मार्गाचा अवलंब करणारी व्यक्ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner