Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी आणि विद्वान म्हणूनही ओळखले जातात. आपल्या हयातीत त्यांनी अनेक प्रकारची धोरणे आखली होती. ही धोरणे नंतर चाणक्य नीती म्हणून ओळखली जाऊ लागली. असे म्हटले जाते की जर कोणीही यशस्वी, समृद्ध आणि आनंदी जीवन जागेचा विचार करत असेल, तर त्याने चाणक्य नीतीमध्ये नमूद केलेल्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. चाणक्य नीतीमध्ये घरच्या प्रमुखाच्या अशा काही चुका सांगितल्या आहेत, ज्या वेळीच सुधारल्या नाहीत तर त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. लोकांच्या या चुकांमुळे घरातील सदस्य कधीच सुखी होत नाहीत. चला तर मग, जाणून घेऊया...
बरेचदा असे घडते की वडीलधारे व्यक्ती घराचे नियम बनवतात, पण ते स्वतः पाळत नाहीत. मात्र, घरातील लहान मुलांनीच हे नियम पाळावेत असे त्यांना वाटत असते. जेव्हा स्वतःचा प्रश्न येतो, तेव्हा ते कधीही नियमांचे पालन करत नाहीत. मुले जे काही शिकतात, ते त्यांच्या पालकांकडून किंवा वडीलधाऱ्यांकडूनच शिकतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही नियम मोडता किंवा गैरवर्तन करता तेव्हा मुलेही या गोष्टी शिकतात. यामुळेच चाणक्य नीतीमध्ये घराच्या प्रमुखालाही नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, घराच्या प्रमुखाला पैसे कसे वाचवायचे आणि खर्च करायचे हे दोन्ही माहिती असले पाहिजे. याला पैशांचे योग्य व्यवस्थापन करणे म्हणतात. घराच्या प्रमुखाने जीवनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करावेत आणि भविष्यातील समस्यांसाठी पैसे वाचवावेत. घरच्या प्रमुखाने विचार न करता पैसे खर्च केले तर कुटुंबाची प्रगती कधीच होत नाही.
चाणक्य नीतीनुसार घराच्या प्रमुखाने कुटुंबातील सर्व सदस्यांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत. ज्या कुटुंबात एकता असते तिथे ताकद असते. अशा कुटुंबात जिथे एकता असते, तिथे एका व्यक्तीला सुद्धा अडचणी येतात तेव्हा सर्वजण एकत्र उभे राहतात. त्याच वेळी, खराब संबंधांमुळे, कुटुंबप्रमुखाला एकट्याने समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा कुटुंबातील मुलांवरही विपरीत परिणाम होतो.
संबंधित बातम्या