Chanakya Niti In Marathi: विवाहबाह्य संबंध किंवा लग्नानंतर दुसऱ्या स्त्री-पुरुषाकडे आकर्षित होणे ही समाजासाठी नेहमीच मोठी समस्या राहिली आहे. आजकाल ही प्रकरणं थोडी अधिक पहायला मिळत आहेत. आपण आपल्या आजूबाजूला अशी प्रकरणे ऐकली असतील, जिथे एक पुरुष पत्नी असूनही, दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतो. यामुळे त्या पुरुषाचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झालेले असते. परंतु, याचा सर्वात वाईट परिणाम स्त्रीवर पडतो. यामागचे कारण काय आहे हे कळणे अवघड आहे. कारण याचे नेमके उत्तर नाही. परंतु, खरे कारण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या धोरणांचा आधार घेऊ शकतो. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये काही कारणे सांगितली आहेत, ज्यामुळे विवाहित पुरुष आपले वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करू पाहत आहे.
अनेकदा नात्यांमधील दुरावा येण्याचे कारण लहान वयात केलेले लग्नही असते. खरं तर लहान वयात मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालं की, त्यांच्यात परिपक्वतेचा अभाव जाणवतो. तसेच, त्यावेळी त्यांच्यावर करिअरसोबतच सर्व जबाबदाऱ्या असतात. यामुळे ते आपल्या वैवाहिक किंवा वैयक्तिक जीवनाकडे फारसे लक्ष देऊ शकत नाहीत आणि जेव्हा सर्व काही सुरळीत होते, तेव्हा ते आपल्या स्वप्न किंवा इच्छांचे पालन करण्यास मोकळे असतात. अशा वेळी विवाहबाह्य संबंध निर्माण होण्याची शक्यता लक्षणीय वाढते.
विवाहबाह्य संबंध असण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे पती-पत्नीच्या नात्यातील अंतर. जेव्हा एक जोडीदार दुसऱ्याची नीट काळजी घेत नाही, त्याचा आदर करत नाही, त्याच्या इच्छेला महत्त्व देत नाही, तेव्हा हळूहळू नात्यात दुरावा येऊ लागतो आणि एकमेकांबद्दल मोहभंग सुरू होतो. अशा वेळी मन आपोआप दुसऱ्या जोडीदाराच्या शोधात असते आणि अशा प्रकारे विवाहबाह्य संबंध असण्याची शक्यताही वाढते.
अनेकदा, मुलांच्या जन्मानंतरही पुरुषांचे इतर महिलांकडे आकर्षण वाढते. खरं तर घरात मूल झालं की नवरा-बायको दोघांचाही प्राधान्यक्रम बदलतो. मूल हेच त्यांचे पहिले प्राधान्य ठरते. विशेषतः मुलाच्या जन्मानंतर स्त्रिया त्यात पूर्णपणे व्यस्त होतात आणि पतीकडे कमी लक्ष देऊ लागतात. यामुळे अनेकदा पुरुष इतर महिलांकडे आकर्षित होऊ लागतात.
नवरा-बायकोचं नातं घट्ट होण्यासाठी मानसिक समाधानाबरोबरच शारीरिक समाधानही असणं गरजेचं आहे. जेव्हा पती-पत्नी शारीरिकदृष्ट्या एकमेकांसोबत समाधानी नसतात, तेव्हा हळूहळू ते दोघेही भावनिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर जाऊ लागतात. अशावेळी तिसरी व्यक्ती सहजपणे त्यांच्या नात्यात आपलं स्थान निर्माण करते.
संबंधित बातम्या