Chanakya Niti In Marathi: मौर्य साम्राज्याचे समकालीन आचार्य चाणक्य यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत. चाणक्य नीतीचे पालन करून कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकते. तुम्ही तुमची अनेक बिघडलेली सुधारू शकता. तज्ज्ञांच्या मते, चंद्रगुप्त मौर्य आचार्य चाणक्य यांच्या याच विचारांचे पालन करून शून्यातून वर पोहोचले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्राचीन काळी अखंड भारताची निर्मिती झाली. त्या काळात चाणक्य हे एक महान तत्त्वज्ञ म्हणून ओळखले गेले. जर, तुम्हालाही तुमच्या आयुष्यात कधीही पराभूत होऊ नये, असे वाटत असेल, तर आचार्य चाणक्यांच्या या ४ गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
आचार्य चाणक्य त्यांच्या रचना शास्त्राच्या सहाव्या अध्यायातील १७व्या श्लोकात म्हणतात की, पुस्तकांच्या अभ्यासाव्यतिरिक्त माणसाला प्राण्यांकडूनही शिकण्याची गरज आहे. कामात आणि वागण्यात एकाग्रता नसेल, तर माणसाला आयुष्यात पुन्हा पुन्हा अपयशाची चव चाखावी लागते. यासाठी माणसाने कोंबडीकडून ४ सवयी शिकल्या पाहिजेत.
> आचार्य चाणक्य म्हणतात की, कोंबडा रोज ब्रह्म मुहूर्तावर उठतो. तुम्हालाही जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर रोज ब्रह्म मुहूर्तावर उठा. यामुळे तुम्हाला काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. याशिवाय तुम्हाला अतिरिक्त वेळही मिळेल. यामुळे तुम्हाला अतिरिक्त काम/अभ्यास करण्यास वेळ मिळेल.
> कोंबडीची दुसरी सवय म्हणजे नेहमी लढाईसाठी तयार राहणे. याचा अर्थ असा आहे की, आपण नेहमी काम करण्यासाठी तयार असले पाहिजे. तुम्ही आळशी असाल, तर मागे राहाल. यासाठी तुमचे काम करण्यास सदैव तयार राहा.
> कोंबडीची तिसरी सवय म्हणजे आपल्या भावंडांना समान वाटा देणे. देव आणि भावाच्या वाट्याचा कधीही अपहार करू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. कोंबडा नेहमी आपल्या भावंडांना समान वाटा देतो. जर, तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर तुमच्या भावाला त्याचा योग्य तो वाटा द्यायलाच हवा.
> कोंबडीची चौथी सवय म्हणजे मजबूत खाणे. आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाने बिनधास्त जेवले पाहिजे. यामुळे व्यक्ती मजबूत होतो. निरोगी मन आणि शरीर असेल, तर व्यक्ती उत्साहाने आपले काम करू शकतो. या ४ गोष्टी लक्षात ठेवल्यास माणूस आयुष्यात कधीही अपयशी होत नाही.
संबंधित बातम्या