Chanakya Niti for Parents: आपलं मूल मोठं होऊन यशस्वी व्यक्ती व्हावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यासाठी पालक लहानपणापासूनच पाया घालायला सुरुवात करतात. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. पण मुलाला यशस्वी बनवण्यासाठी त्याला चांगल्या शाळेत घालणे पुरेसे नाही. कारण शाळेत फक्त शिक्षण मिळेल आणि यशस्वी व्यक्ती होण्यासाठी केवळ शिक्षण पुरेसे नाही. त्यासाठी इतरही अनेक गोष्टींची गरज असते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात मुलांना यशस्वी माणूस बनवण्यासाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांच्यानुसार मुलाला यशस्वी व्यक्ती बनवण्यासाठी त्याचे संगोपन कसे करावे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, मुलांचे संगोपन नेहमी पूर्ण प्रेमाने आणि काळजीने केले पाहिजे. मुलांना घरात असे वातावरण दिले पाहिजे की त्यांना नेहमी सुरक्षित वाटेल आणि त्यांचे पालक त्यांच्यावर किती प्रेम करतात याची त्यांना जाणीव होईल. प्रेमाच्या आणि काळजीच्या वातावरणात जेव्हा मुलांचे संगोपन होते, तेव्हा मुले कोणाचीही भीती न बाळगता आपले जीवन मोकळेपणाने जगतात आणि अशी मुले त्यांच्या आयुष्यात नक्कीच पुढे जातात.
चाणक्य नीतीनुसार मुलांना नेहमी प्रत्येकाचा आदर करायला शिकवले पाहिजे. मुलांना गुरू, आई-वडील, वडीलधारे तसेच स्वत:पेक्षा लहान आणि स्वत:पेक्षा कमकुवत असलेल्यांचा आदर करायला शिकवले पाहिजे. इतरांचा आदर करणाऱ्या लोकांना सर्वत्र मान मिळतो आणि अशा लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले जाते. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच लोकांचा आदर करायला शिकवायला हवं.
आचार्य चाणक्य यांच्या मते मुलांना लहानपणापासूनच योग्य-अयोग्य, धर्म आणि अधर्म शिकवायला हवा. मुलांना लहानपणापासूनच नैतिकतेचे धडे दिले जातात, तेव्हा अशी मुले पुढे चांगल्या चारित्र्याची माणसे बनतात आणि आपल्या घराचे, कुटुंबाचे, आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करतात.
चाणक्य नीतीनुसार मुलांना यशस्वी माणूस बनवण्यासाठी लहानपणापासूनच त्यांना आज्ञाधारक होण्यास शिकवा. मोठ्यांच्या शब्दांचा आदर करून त्यांचे पालन करावे, हे मुलांना शिकवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. पण त्याचबरोबर मुलांना योग्य-अयोग्य शिकवणंही गरजेचं आहे. मोठ्यांच्या चुकीच्या बोलण्यातही मुलांना हो म्हणायला शिकवू नका. चुकीच्या गोष्टीला नाही म्हणणंही गरजेचं आहे.
यशस्वी व्यक्ती होण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्याची तळमळ असणं खूप गरजेचं आहे. मुलं मोठी होत असताना त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. ते आपल्या पालकांना प्रत्येक गोष्टीशी संबंधित प्रश्न विचारत असतात. अशा वेळी पालकांनी संयमाने मुलाच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे. असे केल्याने मुलांमध्ये काहीतरी नवीन शिकण्याचा उत्साह कायम राहील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या