Chanakya Niti: 'या' घरांवर नेहमीच नाराज असते माता लक्ष्मी, वाचा काय सांगते चाणक्य नीती
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: 'या' घरांवर नेहमीच नाराज असते माता लक्ष्मी, वाचा काय सांगते चाणक्य नीती

Chanakya Niti: 'या' घरांवर नेहमीच नाराज असते माता लक्ष्मी, वाचा काय सांगते चाणक्य नीती

Published Sep 06, 2024 08:11 AM IST

Thoughts of Acharya Chanakya: आचार्य चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु होते. ते एक महान ज्ञानी आणि विद्वान असल्याचे म्हटले जाते. आचार्य चाणक्यांनी एक धोरणात्मक ग्रंथ रचला आहे ज्याला 'चाणक्य नीती' म्हणतात.

Chanakya Niti-चाणक्य नीती
Chanakya Niti-चाणक्य नीती

Chanakya Niti In Marathi: धनाची देवी म्हणून माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ज्या लोकांच्या आयुष्यात पैशाची कमतरता आहे त्यांनी लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला आहे. काही घरे अशी असतात, जिथे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आधीच असतो. परंतु त्या घरात काही अयोग्य काम होत असेल, तर देवी लक्ष्मी स्वतः त्या घरातून निघून जाते.आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात अशाच काही परिस्थितींबद्दल सांगितले आहे. चाणक्याची धोरणे त्यांच्या अचूक उत्तरांसाठी आणि थेट निर्देशांसाठी ओळखली जातात. जी माणसांना आनंदी जीवन जगण्यासाठी काय करावे आणि काय करू नये हे सांगते. या लेखात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे की, आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्या परिस्थितीमुळे देवी लक्ष्मी नाराज होते. आणि तुमच्या घरातून निघून जाते.

कोण होते आचार्य चाणक्य?

आचार्य चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु होते. ते एक महान ज्ञानी आणि विद्वान असल्याचे म्हटले जाते. आचार्य चाणक्यांनी एक धोरणात्मक ग्रंथ रचला आहे ज्याला 'चाणक्य नीती' म्हणतात. चाणक्य नीती तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीही साध्य करण्यात मदत करते. जर तुम्ही चाणक्य नीती पूर्णपणे वाचली आणि त्याचे पालन केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही कधीही रोखू शकत नाही.

अन्नाचा आदर केला जात नाही-

चाणक्य नीतीनुसार, देवी लक्ष्मी स्वतः अशा घरातून निघून जाते, जिथे अन्नाचा आदर केला जात नाही. म्हणजे अन्नधान्य फेकून दिले जाते. किंवा नीट साठवले जात नाही. कारण ज्या लोकांवर अन्नाची कृपा असते, त्यांना खूप भाग्यवान मानले जाते. आणि जेव्हा असे भाग्यवान लोक अन्नाचा अपमान करतात, तेव्हा लक्ष्मी देवी कोपते आणि घरातून निघून जाते.

पती-पत्नीमध्ये वाद होतात

पती-पत्नीचे नाते जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक आहे. त्यामुळे या नात्यात दोघांनी एकमेकांचा आदर करून मानसन्मान देणे गरजेचे आहे. परंतु पतिपत्नीमध्ये सतत वाद होत असतील तर ते घरातील सुखसमृद्धीवर प्रभाव टाकतात. आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरामध्ये पती-पत्नीमध्ये वाद होतात, त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा राग कायम राहतो. कारण अशा घरात नेहमी अशांततेचे वातावरण असते. त्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते.

भुकेल्यांना जेवण दिले जात नाही-

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरांमध्ये भुकेल्यांना अन्न दिले जात नाही त्या घरांवर देवी लक्ष्मी नाराज राहते. कारण भुकेल्याला जेवण देण्यापेक्षा पुण्य काम दुसरे कोणतेच नाही. म्हणून जे लोक भुकेल्यांना मदत करत नाहीत. त्यांना समजून न घेता त्यांचा अपमान करतात त्यांच्यावर देवी लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते.

Whats_app_banner