Thoughts of Acharya Chanakya: आयुष्यात यश मिळवण्यासाठी नेहमी योग्य मार्ग निवडला पाहिजे. योग्य मार्गदर्शन माणसाला फक्त पुढे घेऊन जात नाही, तर जीवनाशी संबंधित इतर अनेक पैलूंचीही जाणीव करून देते.आयुष्यात यश मिळवण्यासाठी शिक्षित असणे खूप गरजेचे आहे. परंतु एखाद्याच्या नैतिक गुणांचे ज्ञान असणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. चाणक्य नीतीनुसार व्यक्तीची ओळख त्याच्या गुणांवरून होते. चांगले-वाईट गुण हेच माणसाला दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळे बनवतात. चाणक्यच्या या नीती शास्त्रामध्ये जीवनाशी संबंधित अनेक विषय सांगितले आहेत. त्यात त्या व्यक्तीचाही उल्लेख आहे ज्यात सर्व गुण आहेत जे त्याला महान आणि प्रसिद्ध बनवतात. परंतु जर त्यांचे आचरणच योग्य नसेल तर त्यांचे महत्त्व कमी होते. याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत.
1) गुणो भूषयते रूपं शीलं भूषयते कुलम् ।
सिद्धिर्भूषयते विद्यां भोगो भूषयते धनम् ।।
आचार्य चाणक्य यांच्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की, गुणांमुळे माणसाचे सौंदर्य वाढते. तुमच्यातील नम्रता तुमच्या कुटुंबाला वैभव प्राप्त करून देते. याशिवाय कामात यश मिळाल्याने ज्ञान वाढते आणि पैशाचा योग्य वापर केल्याने संपत्तीचे सौंदर्य वाढते. या श्लोकावरून हे कळते की, एखाद्या व्यक्तीचे शरीर सुंदर असले, तरी त्यात गुण नसतील तर अशा सौंदर्याचा काहीच उपयोग नाही. असे मानले जाते की चांगल्या आचरणाने कुटुंबाला नेहमीच वैभव प्राप्त होते.
2) निर्गुणस्य हतं रूपं दुःशीलस्य हतं कुलम्।
असिद्धस्य हता विद्या अभोगेन हतं धनम्।।
आचार्य चाणक्य यांच्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जर एखाद्या व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा गुण नसेल तर त्याचे सौंदर्य व्यर्थ आहे. याशिवाय आचार्य चाणक्य सांगतात की, ज्या व्यक्तीच्या आचरणात श्रेष्ठता नाही त्याच्या लोकांच्यातच त्याची निंदा केली जाते. जर एखाद्या व्यक्तीमध्ये कोणतेही कार्य पूर्ण करण्याची शक्ती नसेल तर त्याचे ज्ञान निरुपयोगी मानले जाते.
3नाग्निहोत्रं विना वेदा न च दानं विना क्रिया।
न भावेन विना सिद्धिस्तस्माद्भावो हि कारणम् ।।
आचार्य चाणक्याच्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की, कर्माशिवाय वेदांचे अध्ययन व्यर्थ आहे. आणि दान, यज्ञ वगैरे कर्मे निष्फळ समजली जातात. असे मानले जाते की, कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी ते नेहमी मन आणि भक्तीने केले पाहिजे. कारण त्याशिवाय कोणत्याही कामात यश मिळत नाही. चाणक्याच्या मते, व्यक्तीच्या भावना आणि विचार हे यशाचे सर्वात मोठे कारण आहे.
संबंधित बातम्या